AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे भीष्म पितामह; पण…

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी खर्गेंच्या नावाची चर्चा सुरु झाल्यानंतर शशी थरूर म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे यांची उमेदवारी निश्चितच स्वागतार्ह आहे.

मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे भीष्म पितामह; पण...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Sep 30, 2022 | 5:47 PM
Share

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष पदावरुन राजस्थानातील काँग्रेसची (Congress President) गटबाजी समोर आली, आणि त्यामध्ये अशोक गेहलोतांचा (Ashok Gehlot) राजकीय बळी गेला. अध्यक्ष पदाच्या निवडणुका जाहीर होताच अशोक गेहलोतांनी सचिन पायलट यांच्यावर राजकारण खेळण्यास चालू केलं. मात्र या युद्धात सचिन पायलटांचा बळी न जाता गेहलोतांनाच सपशेल माघार घ्यावी लागली. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या नावाला गांधी कुटुंबीयांनी पसंदी दिल्यानंतर आता शशी थरुरांची मनधरणी करावी लागतन नाही. त्यामुळे शशी थरुरांनी केलेले वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतरही शशी थरूर यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिला आहे.

तर खर्गे यांना काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून का प्रोजेक्ट केले जात आहे, असा सवालही त्यांनी हायकमांडला विचारला आहे.

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी खर्गेंच्या नावाची चर्चा सुरु झाल्यानंतर शशी थरूर म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे यांची उमेदवारी निश्चितच स्वागतार्ह आहे.

खरं तर पक्षहिताच्या दृष्टीने अनेक उमेदवारांची तशी गरज असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. खर्गेंनी उमेदवारी जाहीर केली असली तरी मीही काही निवडणूक लढण्यापासून मागे हटणार नाही, असं सांगत ज्यांनी माझ्याकडून आशा ठेवल्या आहेत, त्यांना मी निराश करु शकत नाही असंही त्यांनी सांगितले.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविषयी बोलताना ते त्यांना म्हणाले की, ते नक्कीच पक्षाचे भीष्म पितामह आहेत. त्यामुळे माझी उमेदवारी ही त्यांचा अनादर करण्यासाठी नाही तर पक्षाच्या विचाराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत शशी थरुन यांनी बोलताना सांगितले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाकडे अधिकृत उमेदवार नसल्याचे आश्वासन दिले आहे.

त्यामुळे या निवडणुकीत गांधी परिवार तटस्थ राहणार आहे. त्यामुळे माझ्या उमेदवारीमुळे कोणाचाही अपमान होऊ नये, हीच भावना माझ्या मनात ठेवून मी उमेदवारी जाहीर केल्याचे थरुर यांनी सांगितले.

मल्लिकार्जुन खर्गे आणि आपल्या उमेदवारीविषयी बोलताना ते म्हणाले की, आम्ही काही शत्रू नाही, किंवा प्रतिस्पर्धीही नाही.

आम्ही चांगले मित्र आहोत आणि पक्षाची प्रगती करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आता पक्षाला कोणत्या दिशेने पुढे घेऊन जायचे हे काँग्रेसचे कार्यकर्तेच ठरवतील असंही त्यांनी सांगितले.

खर्गे, दिग्विजय सिंह, के. एन. त्रिपाठी यांच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही नकारात्मक भावाना नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मी ही निवडणूक लढवण्याचा यासाठीच निर्णय घेतला आहे की, काँग्रेसला मला बळकट करायचे आहे. पक्षाला बळकट करण्यासाठी माझ्याकडे व्हिजन तयार आहे.

त्यासाठी कल्पना आणि संकल्पना तयार आहेत. त्यामुळे परिवर्तनाचा मला एक प्रतिनिधी व्हायचे आहे. त्यासाठी मी अर्ज दाखल केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, शुक्रवारी शशी थरूर, मल्लिकार्जुन खर्गे आणि के.एन. त्रिपाठी यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.

Follow Us
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं
दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट...
दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट संपली, बैठकीत...
अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
रात्रभर झोप नव्हती... अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर...
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर दमानियांची सुचक प्रतिक्रिया
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लील
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लीला रवाना; मोठ्या...
उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली! - सुप्रिया सुळे
Supriya Sule | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली!