AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, देशभरात तब्बल इतक्या कोरोनाबाधितांची नोंद

देशात पुन्हा एकदा हळू हळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे, महाराष्ट्र कर्नाटक आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.

कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, देशभरात तब्बल इतक्या कोरोनाबाधितांची नोंद
| Updated on: May 30, 2025 | 8:13 PM
Share

देशात पुन्हा एकदा हळू हळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे, देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1000 पेक्षा जास्त झाली आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार दिल्ली -एनसीआरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 104 वर पोहोचली आहे. गुरुग्राममध्ये शुक्रवारी नव्या तीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या दहा दिवसांमध्ये शहरात 16 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे, यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी म्हटलं आहे की, दिल्लीमध्ये कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे, मात्र काळजी करण्याचं काही कारण नाही, रुग्णालय आणि सरकार अलर्ट मोडवर आहेत. सध्या स्थितीमध्ये दिल्लीत 19 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार रुग्णालयात सुरू आहे, तर बाकी सर्व रुग्णांना घरीच क्वॉरटांईन करण्यात आलं आहे. जरी रुग्ण काही प्रमाणात वाढत असेल तरी चिंता करण्याचं कारण नाही, कारण अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे. गेल्या आठवड्यात 24 रुग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषधं, ऑक्सिजनचा पुरवठा आणि इतर सुविधा तयार ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

कर्नाटकमध्येही रुग्ण संख्येत वाढ

दुसरीकडे कर्नाटक राज्यात देखील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 126 वर पोहोचला आहे, तर एका वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कर्नाटकच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाकडून देखील या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचं प्रमाण राज्यात वाढलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता देखील वाढली आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र जरी काही प्रमाणात रुग्ण वाढले असले तरी देखील सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.