AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शशी थरुरांचा पराभव झाला तो त्यांनी मान्यही केला , मात्र काँग्रेसला त्यांनी ताकीदही दिलेय…

थरूर (Shashi Tharoor) यांचा पराभव झाला असला तरी त्यांची 1,072 मते ही गांधी कुटुंबासाठी एक प्रकारचा सावधगिरीचा इशाराही असल्याचे सांगितले जात आहे.

शशी थरुरांचा पराभव झाला तो त्यांनी मान्यही केला , मात्र काँग्रेसला त्यांनी ताकीदही दिलेय...
| Updated on: Oct 19, 2022 | 9:50 PM
Share

नवी दिल्लीः काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक (Congress President Election 2022) पार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा नेतृत्वावरुन जोरदार चर्चा होऊ लागली आहे. या निवडणुकीने पक्ष आणि गांधी परिवाराच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत थरूर (Shashi Tharoor) यांचा पराभव झाला असला तरी त्यांची 1,072 मते ही गांधी कुटुंबासाठी (Gandhi Family) एक प्रकारचा सावधगिरीचा इशाराही असल्याचे सांगितले जात आहे.

थरुरांचा पराभव झाला असला तरी त्यांना आता कोणते ना कोणते पद देऊन त्यांना सांभाळणेही गरजेच आहे असं मत राजकीय विश्लेषक मांडत आहेत.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर नवे अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांची निवड करण्यात आली आहे. तर या निवडणुकीत शशी थरूर यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस अध्यक्ष पदाच्या या निवडणुकीत 9,385 मतं पडली होती.

तर त्यापैकी खरगे यांना 7897 मते मिळाली तर थरूर यांना 1072 मतांवर समाधान मानावे लागले आहे. तर 416 मते अवैध ठरली आहेत.

शशी थरूर यांच्या या पराभवाने देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस पक्षालाच जो संदेश द्यायचा आहे तो त्यांनी दिला आहे. या निवडणुकीतील पराभवाच्या फरकाने काँग्रेसमधील परिवर्तनाची इच्छा स्पष्टपणे दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

शशी थरूर यांच्यासाठी 1072 मतांची संख्या परिणाम कारक आहे. आणि गांधी कुटुंबीयांसाठी एक प्रकारचा ती सुचनाही आहे. त्या 1 हजार मतातूनच काँग्रेस पक्षातील बदलाची अपेक्षा करण्यात आली आहे.

जर 9000 पैकी 1072 लोक त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीला मतदान करू शकत असतील तर, हीच विचारसरणी असलेल्या काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींची संख्या अधिक असण्याचीही शक्यता आहे असंही सांगण्यात येत आहे.

या परिस्थितीत 2024 नंतर होणाऱ्या निवडणुकीत हा आकडा उलटण्याची शक्यता आहे. म्हणजे 8000 मते गांधी घराण्याच्या विरोधातील उमेदवाराला जाऊ शकतात आणि गांधींना पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराला फक्त 1072 मते मिळू शकतात असंही मत व्यक्त केले जात आहे.

गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल..
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल...
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं.
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?.
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात...
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.