CJP Delhi Protest : माझे उपोषण सुरूच राहणार, सोनम वांगचूक यांची घोषणा; सरकारकडे केली महत्त्वाची मागणी!
माझ्या तरुणांना जोपर्यंत संसद भवन परिसरात खासदारांना भेटू दिले जात नाही किंवा मला रुग्णालयातच खासदारांशी भेटू दिले जात नाही तोपर्यंत माझे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका वांगचूक यांनी जाहीर केली.

Sonam Wangchuk Delhi Protest : दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात देशभरातील तरुण सहभागी झाली आहेत. या आंदोलनाचा आजचा 23 वा दिवस आहे. कॉकरोच जनता पार्टीने 20 जुलै रोजी थेट ‘संसद मार्च’ काढण्याचे जाहीर केले होते. तसेच तरुणांनी या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहनही केले होते. आंदोलकांनी मात्र संसदेकडे जाऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. विरोधकांनीही या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. या आंदोलनाचे नेतृत्त्व करत असलेल्या सोनम वांगचूक यांनी आपले अन्नत्याग आंदोलन सोडले आहे, असे म्हटले जात होते. परंतु आता वांगचूक यांनी माझे हे आंदोलन सुरूच राहील, असे सांगितले आहे.
माझे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील
सोनम वांंगचूक यांच्यावर सध्या दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणांनी संसदेकडे कूच केल्यानंतर पोलिसांनी तरुणांवर साठीमार केला. तसेच काही ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. पोलिसांच्या या भूमिकेवर आक्षेप घेत माझे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील, असे वांगचूक यांनी जाहीर केले आहे.
तरुणांच्या या भूमिकेमुळे मी खूप प्रभावित झालो
माझ्या तरुणांना जोपर्यंत संसद भवन परिसरात खासदारांना भेटू दिले जात नाही किंवा मला रुग्णालयातच खासदारांशी भेटू दिले जात नाही तोपर्यंत माझे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील. या सरकारने केंद्रीय शिक्षणमंत्र्यांवरील जबाबदारी निश्चित करावी, अशी माझी अपेक्षा आहे. आजच्या आंदोलनात तरुणांच्या भावनांचा उद्रेक व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण तरीदेखील तरुणांनी शांतता कायम ठेवली. तरुणांच्या या भूमिकेमुळे खूप प्रभावित झालो आहे. तरुणांना संसदेपुढे आपले मत मांडण्याची पवानगी द्यावी. हाच यावर तोडगा असू शकतो, असेही आवाहन त्यांनी पोलीस आणि केंद्र सरकारला केले.
सरकार नेमका काय निर्णय घेणार?
दरम्यान, आता सोनम वांगचूक यांनी आपले अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा केल्यानंतर सीजेपीचे आंदोलन आणखी पेटणार का? या आंदोलनाला पाठिंबा वाढत जाणार का? सरकार नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठऱणार आहे.