AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Curfew : एकही आकडा लपवला नाही, केजरीवालांचं उद्धव ठाकरेंच्या पावलावर पाऊल, दिल्लीत आठवडाभर लॉकडाऊन

नवी दिल्लीमध्ये पुढील आठवडाभर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. Arvind Kejriwal lockdown Delhi

Delhi Curfew : एकही आकडा लपवला नाही, केजरीवालांचं उद्धव ठाकरेंच्या पावलावर पाऊल, दिल्लीत आठवडाभर लॉकडाऊन
अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री
| Updated on: Apr 19, 2021 | 1:00 PM
Share

नवी दिल्ली: देशाच्या राजधानीमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. नवी दिल्लीतील आरोग्य यंत्रणा कोलमडली नाही मात्र, आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेएवढे रुग्ण आढळत आहेत. या परिस्थितीमुळं नवी दिल्लीमध्ये पुढील आठवडाभर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना त्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. (Delhi CM Arvind Kejriwal announce lockdown till 26th April in Delhi)

अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या चौथ्या लाटेला तोंड देत आहे. राज्यात 25 हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. या रुग्णसंख्या आणि दिल्लीची आरोग्य यंत्रणा जवळपास सारखी आहे. यामुळं यंत्रणेवर ताण आला आहे. सरकारकडून आरोग्य यंत्रणा कोलमडली जाऊ नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

तर बेड कमी पडू शकतात

नवी दिल्लीत गेल्या 24 तासात 23 हजार 500 रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढीचा असाच वेग राहिला तर दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड कमी पडू शकतात, असं केजरीवाल म्हणाले.

पुढच्या सहा दिवसात काय करणार?

अरविंद केजरीवाल यांनी पुढील सहा दिवसात आरोग्य यंत्रणा बळकट करणार असल्याचं सांगितले. येत्या सहा दिवसात बेडची संख्या वाढवली जाईल. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ऑक्सिजन, औषधे यांची व्यवस्था करणार आहोत. सर्व दिल्लीकरांनी 26 एप्रिलपर्यंत लावलेल्या लॉकडाऊनमध्ये सहकार्य करावं. दिल्लीला सहकार्य केल्याबद्दल केंद्र सरकारचं आभार असंही केजरीवाल म्हणाले.

स्थलांतरीत मजुरांना आवाहन

अरविंद केजरीवाल यांनी स्थलांतरीत मजुरांना हात जोडून विनंती केली. यावेळी हा केवळ सहा दिवसांचा लॉकडाऊन लावत आहोत, दिल्ली सोडून जाऊ नका, अशी विनंती केली आहे. नवी दिल्ली सरकार तुमची काळजी घेईल, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

नवी दिल्लीत काय सुरु राहणार?

अत्यावश्यक सेवा, खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या सेवा, वैद्यकीय सेवा सुरु राहतील. लग्न समारंभामध्ये 50 लोकं उपस्थित राहू शकतात, त्यासाठी वेगळे पास देण्यात येणार आहेत. अधिकारी सविस्तर सूचना जारी करतील, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

संबंधित बातम्या:

Coronavirus: देशातील परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक; दिल्लीत एका आठवड्याचा कर्फ्यू

Explained: कोरोना निदानात पल्स ऑक्‍सिमीटरचं महत्त्व वाढलं, काय उपयोग, कसं वापरावं, किंमत किती?

(Delhi CM Arvind Kejriwal announce lockdown till 26th April in Delhi)

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.