Delhi Violence : आंदोलकांनी विश्वासघात केला, आम्ही संयम पाळला – दिल्ली पोलिस

दिल्ली पोलिस महासंचालकांनी शेतकरी नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. शेतकरी नेत्यांनी विश्वासघात केला पण आम्ही संयम बाळगला, असं पोलिस महासंचालक एस. एन. श्रीवास्तव त्यांनी म्हटलंय.

Delhi Violence : आंदोलकांनी विश्वासघात केला, आम्ही संयम पाळला - दिल्ली पोलिस
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 9:07 PM

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर आज दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी दिल्ली पोलिस महासंचालकांनी शेतकरी नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. शेतकरी नेत्यांनी विश्वासघात केला पण आम्ही संयम बाळगला, असं पोलिस महासंचालक एस. एन. श्रीवास्तव त्यांनी म्हटलंय. पत्रकार परिषदेत त्यांनी पोलिस कारवाईचीही माहिती दिली. त्याचबरोबर किती पोलिस कर्मचारी जखमी झाले याची आकडेवारीही सांगितली आहे.(Delhi Police made serious allegations against the farmer leaders)

‘दिल्लीतील हिंसाचारात 394 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. शेतकरी नेते आंदोलकांना भरीस घालत होते. त्यांनीच ठरवून दिलेल्या मार्गावरुन ट्रॅक्टर रॅली काढण्यास विरोध केला. शेतकरी नेते आंदोलकांना कशाप्रकारे भरीस घालत आहेत याचे व्हिडीओ पोलिसांकडे असल्याचंही त्यांनी सांगितलं. गाजीपूरमध्ये राकेश टिकैत यांची टीम बॅरिकेट्स तोडून दिल्लीत घुसले. पोलिसांकडे अनेक पर्याय होते पण आम्ही संयम बाळगला. शेतकरी नेतेही हिंसाचारात सहभागी होते,’ असा गंभीर आरोप पोलिस महासंचालकांनी केलाय. हिंसाचारात पोलिसांच्या 30 गाड्यांचं नुकसान झालं. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याचं श्रीवास्तव म्हणाले.

‘शेतकरी नेते दोषी आढळल्यास सोडलं जाणार नाही’

कोणताही शेतकरी नेता दोषी आढळल्यास त्यांना सोडलं जाणार नाही. पोलिसांनी आतापर्यंत 25 पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले आहेत. हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ आमच्याकडे आहेत. आम्ही चेहरा ओळखणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर करु. आतापर्यंत 19 आरोपींना अटक करण्यात आलंय, तर 50 जणांना ताब्यात घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

हिंसेनंतर दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार!

दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसेनंतर राष्ट्रीय किसान मजदूर संघ आणि भारतीय किसान यूनियनने (भानू) आंदोलनातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्ही.एम. सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी आंदोलनातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे इथून पुढे ही संघटना या आंदोलनात राहणार नाही. अशा प्रकारे आंदोलन चालत नसतं. इथं कुणाला मार खाण्यासाठी किंवा शहीद करण्यासाठी आम्ही आलेलो नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला. तसेच शेतकरी नेते राकेश टिकैत सरकारसोबत चर्चेला गेल्याचा आरोपही त्यांनी केला. टिकैत सरकारसोबत चर्चेला गेले पण त्यांनी तिथे उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला का? त्यांनी धान खरेदीबाबतचे प्रश्न या बैठकीत मांडलेत का? आम्ही केवळ पाठिंबा देतो आणि काही लोक नेते बनत आहेत. हे आपलं काम नाही. हिंसेशी आमचं काहीही घेणंदेणं नाही, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

शेतकरी आंदोलनात फूट?; हिंसेनंतर दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार!

दिल्ली हिंसा: राकेश टिकैत यांच्यासह 6 शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल

Delhi Police made serious allegations against the farmer leaders

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.