AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांचा धक्कादायक दावा, राजीनाम्यावर खुलासा, थेट म्हटले, दिशाभूल..

नीट पेपरफुटीत मोठे आंदोलन देशभरात बघायला मिळाले. कॉकरोच जनता पार्टीकडून हे आंदोलन करण्यात आले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. राजीनाम्यानंतर आता पहिल्यांदाच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यावर भाष्य केले.

धर्मेंद्र प्रधान यांचा धक्कादायक दावा, राजीनाम्यावर खुलासा, थेट म्हटले, दिशाभूल..
Dharmendra Pradhan
| Updated on: Aug 09, 2026 | 3:54 PM
Share

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांना द्यावा लागला. नीट पेपरफुटीत मोठे आंदोलन देशभरात झाले. कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरू होते. अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात दाखल झाले आणि त्यांनी मोठे आंदोलन देशात उभे केले. विद्यार्थी रस्त्यावर उतरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर मोठा दबाव होता. अखेर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पहिल्यांच मोठे विधान केले. धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की, युवा पिढीची दिशाभूल करण्यात आली. देश आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता मी राजीनामा दिला. वरिष्ठ भाजपा नेते आणि संबलपुरचे खासदार धर्मेंद्र प्रधान यांनी भुवनेश्वर येथील जीएम विश्वविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलताना आपल्या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया दिली.

धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की, काही लोकांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. भारतात दरवर्षी कमीत कमी दोन कोटी लेकरं जन्म घेतात. 10 वर्षात 20 कोटी मुलांनी जन्म घेतला. त्यांच्या काही आकांक्षा आहेत. माझ्यासाठी पद महत्वाचे नाही. यादरम्यान बाहेर बीजेडीच्या कार्यकर्त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावर बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की, मी घोषणाबाजीमुळे अजिबात त्रस्त नाही.

मी एका शेतकऱ्याच्या मुलगा आहे. मला परत जाण्यास सांगितले तरीही मी परत जाणार नाही. मी परत येईल. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यावर पहिल्यांदाच भाष्य केले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर मोठा दबाव होता. सरकारने आंदोलकांशी चर्चा करण्याच प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाहीत.

अखेर सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. धर्मेंद्र प्रधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील महत्वाचा चेहरा होते. ओडिसामधील मोठा ओबीसी चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाते. विशेष म्हणजे 12 वर्षांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात होते. शेवटपर्यंत त्यांचा राजीनामा होणार नाही, याकरिता सरकारने प्रयत्न केले.

Follow Us
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर