AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप सत्तेत आल्याने आमचे चांगले दिवस नाही, तर… मोहन भागवत काय म्हणाले?

भाजप सत्तेत आल्यामुळे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला चांगले दिवस आले का? या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे, तसेच त्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका देखील मांडली.

भाजप सत्तेत आल्याने आमचे चांगले दिवस नाही, तर... मोहन भागवत काय म्हणाले?
मोहन भागवत Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 08, 2026 | 2:51 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्त आरएसएसकडून  विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.  मुंबईतील वरळी डोममध्ये संघाचे मनोमिलन सुरू आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहोन भागवत यांनी विविध मुद्यांवर आपले विचार मांडले आहेत. भाजप सत्तेत आल्यामुळे संघाचे चांगले दिवस सुरू झाले आहेत का? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. भाजप सत्तेत आल्याने संघांचे चांगले दिवस आले का तर हे उलट आहे. आमच्या मेहनतीमुळे आमचे चांगले दिवस सुरु झाले, असं यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मोहन भागवत? 

भाजप सत्तेत आल्यामुळे संघाचे चांगले दिवस सुरू झाले आहेत का? असा प्रश्न यावेळी मोहन भागवत यांना यावेळी विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपा सत्तेत आल्याने संघांचे चांगले दिवस आले का? तर हे उलट आहे. आमच्या मेहनतीमुळे आमचे चांगले दिवस सुरु झाले आहेत. आम्ही अयोध्या, राम जन्मभूमी आंदोलन सुरु केलं, लोक जोडली गेली. लोकांना आमची भूमिका पटली, लोकांपर्यत पोहचणे आणि त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करणं हे आमचं काम आहे, असं यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

आमची शक्ती आहे, लोकं आमचं ऐकत असतील तर त्यांचा फायदा होतो.  त्यांनी आमची साथ दिली म्हणून त्यांना चांगले दिवस आले.  आम्ही भाजपवर कोणताही दबाव टाकला नाही, आमच्या संघाच्या शाखेत कोणतेही राजकारण होत नाही. आम्हला कुणी सल्ला मागितला तर सर्वांना मिळणार. त्यांचं पुण्य त्यांच्याकडे, त्यांचं पाप थोडं आमच्याकडे कारण ते आमच्याकडून गेले आहेत.  राजकारणत कुणाचाही दबाव नसतो, असेल तर तो मतदारांचा असतो, असंही यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?.
पंतप्रधानांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती मिळाली! फडणवीसांचं मत
पंतप्रधानांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती मिळाली! फडणवीसांचं मत.
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी.
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल.