AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप सत्तेत आल्याने आमचे चांगले दिवस नाही, तर… मोहन भागवत काय म्हणाले?

भाजप सत्तेत आल्यामुळे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला चांगले दिवस आले का? या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे, तसेच त्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका देखील मांडली.

भाजप सत्तेत आल्याने आमचे चांगले दिवस नाही, तर... मोहन भागवत काय म्हणाले?
मोहन भागवत Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 08, 2026 | 2:51 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्त आरएसएसकडून  विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.  मुंबईतील वरळी डोममध्ये संघाचे मनोमिलन सुरू आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहोन भागवत यांनी विविध मुद्यांवर आपले विचार मांडले आहेत. भाजप सत्तेत आल्यामुळे संघाचे चांगले दिवस सुरू झाले आहेत का? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. भाजप सत्तेत आल्याने संघांचे चांगले दिवस आले का तर हे उलट आहे. आमच्या मेहनतीमुळे आमचे चांगले दिवस सुरु झाले, असं यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मोहन भागवत? 

भाजप सत्तेत आल्यामुळे संघाचे चांगले दिवस सुरू झाले आहेत का? असा प्रश्न यावेळी मोहन भागवत यांना यावेळी विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपा सत्तेत आल्याने संघांचे चांगले दिवस आले का? तर हे उलट आहे. आमच्या मेहनतीमुळे आमचे चांगले दिवस सुरु झाले आहेत. आम्ही अयोध्या, राम जन्मभूमी आंदोलन सुरु केलं, लोक जोडली गेली. लोकांना आमची भूमिका पटली, लोकांपर्यत पोहचणे आणि त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करणं हे आमचं काम आहे, असं यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

आमची शक्ती आहे, लोकं आमचं ऐकत असतील तर त्यांचा फायदा होतो.  त्यांनी आमची साथ दिली म्हणून त्यांना चांगले दिवस आले.  आम्ही भाजपवर कोणताही दबाव टाकला नाही, आमच्या संघाच्या शाखेत कोणतेही राजकारण होत नाही. आम्हला कुणी सल्ला मागितला तर सर्वांना मिळणार. त्यांचं पुण्य त्यांच्याकडे, त्यांचं पाप थोडं आमच्याकडे कारण ते आमच्याकडून गेले आहेत.  राजकारणत कुणाचाही दबाव नसतो, असेल तर तो मतदारांचा असतो, असंही यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

Follow Us
NEET परीक्षा रद्द होताच विद्यार्थ्यांचा संताप अनावर; रस्त्यावर उतरून..
NEET परीक्षा रद्द होताच विद्यार्थ्यांचा संताप अनावर; रस्त्यावर उतरून...
विद्यार्थ्यांना मोठा झटका.... अचानक नीट परीक्षा रद्द; सीबीआयची एन्ट्री
विद्यार्थ्यांना मोठा झटका.... अचानक नीट परीक्षा रद्द; सीबीआयची एन्ट्री.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात, ईडीचं समन्स? चौकशी
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात, ईडीचं समन्स? चौकशी.
महाराष्ट्र पोलिसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमकी घोषणा काय?
महाराष्ट्र पोलिसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमकी घोषणा काय?.
मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये; विभागीय बैठका ऑनलाइन
मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये; विभागीय बैठका ऑनलाइन.
सुवेंदू अधिकारी यांचा मास्टरस्ट्रोक? निवडणूक अधिकाऱ्याचीच या पदावर...
सुवेंदू अधिकारी यांचा मास्टरस्ट्रोक? निवडणूक अधिकाऱ्याचीच या पदावर....
आई तुळजाभवानीच्या चरणी रेकॉर्डब्रेक सोनं; आकडा ऐकूनच व्हाल थक्क....
आई तुळजाभवानीच्या चरणी रेकॉर्डब्रेक सोनं; आकडा ऐकूनच व्हाल थक्क.....
पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! भाजप सत्तेत येताच मोठी कारवाई; गंभीर..
पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! भाजप सत्तेत येताच मोठी कारवाई; गंभीर...
आमच्याकडून चूक झाली, यापुढे मी किंवा माझे सहकारी... राज ठाकरे यांचं...
आमच्याकडून चूक झाली, यापुढे मी किंवा माझे सहकारी... राज ठाकरे यांचं....
बेवड्यांचं काही खरं नाही...थलपती विजयची तळीरामांवर वाकडी नजर.....
बेवड्यांचं काही खरं नाही...थलपती विजयची तळीरामांवर वाकडी नजर......