AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

73 वर्ष जुन्या कारसाठी तुटले शाही परिवारातील लग्न, प्रकरण पोहचले सर्वोच्च न्यायालयात

मुलाच्या परिवाराने मुलीच्या परिवारावर लग्नात रक्कमेत हेराफेरी केल्याचा दावा केला आहे. त्यासंदर्भात पोलिसात तक्रारही दिली आहे. त्यानंतर मुलीच्या परिवाराने मुलावर हुंडा मागितल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. या प्रकरणात घटस्फोटाचा दावा ऋषिकेश आणि ग्वालियरमध्ये दाखल करण्यात आला होता.

73 वर्ष जुन्या कारसाठी तुटले शाही परिवारातील लग्न, प्रकरण पोहचले सर्वोच्च न्यायालयात
| Updated on: Nov 14, 2024 | 1:03 PM
Share

सर्वोच्च न्यायालयात एका वेगळ्या प्रकरणाची सुनावणी झाली. हे प्रकरण 1951 खास रोल्स-रॉयस कारचे आहे. ही कार वडोदराच्या महाराणीसाठी एचजे मुलिनर एंड कंपनीने बनवले होते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी महाराणीसाठी या कारची ऑर्डर दिली होती. आता या कारमुळे ग्वालियरमधील शाही परिवारावारातील मुलीचे लग्न तुटले आहे. तसेच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहचले आहे.

काय आहे प्रकरण

मुलीचे परिवार स्वत:ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे एडमिरल आणि कोकणातील शासक असल्याचा दावा करतात. दुसरीकडे मुलीचे वडील आर्मीमध्ये कर्नल होते. त्यांचा परिवार इंदूरमध्ये एक शैक्षणिक संस्था चालवतो. दोन्ही परिवारात मार्च 2018 मध्ये ग्वालियर येथे साखरपुडा झाला होता. त्यानंतर ऋषिकेशमध्ये लग्न झाल्याचा दावा केला जातो. त्यानंतर एका कारमुळे दोन्ही परिवारात वाद झाला. त्या वादामुळे मुलगी कधी सासरी आली नाही.

मुलाच्या परिवाराने मुलीच्या परिवारावर लग्नात रक्कमेत हेराफेरी केल्याचा दावा केला आहे. त्यासंदर्भात पोलिसात तक्रारही दिली आहे. त्यानंतर मुलीच्या परिवाराने मुलावर हुंडा मागितल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. या प्रकरणात घटस्फोटाचा दावा ऋषिकेश आणि ग्वालियरमध्ये दाखल करण्यात आला होता. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले. त्यावेळी मुलीच्या परिवाराने म्हटले की, मुलाच्या परिवाराने आमच्याकडे असलेली रोल्स-रॉयस कार आणि मुंबईत एक फ्लॅट हुंडा म्हणून मागितला.

सर्वोच्च न्यायालयाने नेमला मधस्थ

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुइया यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आले. त्यावेळी वरिष्ठ वकील विभा दत्ता मखीजा यांनी सांगितले की, महिला कठीण परिस्थितीत अडकली आहे. त्यांच्या शाही परिवारात पुन्हा लग्न करण्याची परंपरा नाही. युक्तीवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकणात न्या. आर बसंत यांना मध्यस्थ म्हणून नियुक्त केले आहे. त्यावेळी न्यायालयाने म्हटले, यापूर्वी दोन्ही पक्षात मध्यस्था होऊ शकली नाही. त्यानंतर आता पुन्हा एक प्रयत्न केले जात आहे.

Follow Us
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...