
पत्नीसह सासरकडील छळामुळे AI अभियंता अतुल सुभाष याने आत्महत्या केली. देशात छळ, कुत्सित टीका, अंहकार, स्वभाव न जुळणं अशा अनेक कारणांमुळं घटस्फोटाचा स्फोट होत आहे. आजकाल लग्नाचा घट बसतो न बसतो की घटस्फोट व्हायला लागली आहेत, अशी वाक्य हल्ली आपल्या कानावर अधिक यायला लागली आहेत. भारतात घटस्फोटाचे प्रमाण जगापेक्षा कमी आहे. पण त्याचा आलेख उंचावत असल्याने चिंता पण आहे. देशात जवळपास 14 लाख लोक हे घटस्फोटित आहेत. तर 35 लाख पति-पत्नी विभक्त राहत असल्याचा दावा आकडेवारी करते. याचा अर्थ लग्न हा भातुकलीचा खेळ होत चाललाय का? देशात घटस्फोटाचे वाढतंय का प्रमाण? स्वातंत्र्यानंतर...