AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्वानामुळे वाचला 67 लोकांचा जीव, नेमकं काय घडलं? वाचा…

एका श्वानामुळे तब्बल 67 लोकांचा जीव वाचला आहे. दुर्घटनेपूर्वी एका श्वानाने इशारा दिला होता, त्यामुळे जीवितहानी टळली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

श्वानामुळे वाचला 67 लोकांचा जीव, नेमकं काय घडलं? वाचा...
| Updated on: Jul 09, 2025 | 7:07 PM
Share

काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सियाठी गावात भूस्खलन झाले होते. यामुळे संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. मात्र या घटनेत एका श्वानामुळे तब्बल 67 लोकांचा जीव वाचला आहे. या दुर्घटनेपूर्वी एका श्वानाने दिलेल्या इशाऱ्यामुळे लोकांचा जीव वाचला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

30 जूनच्या रात्री सियाठी गावात मुसळधार पाऊस पडत होता. गावातील लोक आरामात झोपले होते. मात्र त्या रात्री एका घरातील दुसऱ्या मजल्यावर असलेला एक श्वान अचानक जोरजोरात भुंकू लागला, यामुळे कुंटूंबीयांना जाग आली. लोक सुरुवातीला घाबरले, मात्र त्यांना घराच्या भिंतीला तडे गेल्याचे दिसले. यामुळे घरात पाणी भरायला सुरुवात झाली होती.

67 लोकांचे प्राण वाचले

यानंतर कुंटूंबाने श्वानाला सोबत घेतले आणि घराबाहेर पडत सुरक्षित ठिकाण गाठले. यावेळी लोकांनी शेजाऱ्यांनाही जागे केले आणी सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेले. काही वेळाने डोंगराचा एक मोठा भाग तुटून गावावर पडला. यात डझनभर घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली, मात्र या श्वानाच्या इशाऱ्यामुळे गावातील 67 लोकांचे प्राण वाचले. हे सर्व लोक सध्या मंदिरात आश्रय घेत आहेत.

प्राण्यांना नैसर्गिक आपत्तीची माहिती समजते

याआधीही अनेकदा प्राण्याची नैसर्गित आपत्तीची सूचना दिल्याचे समोर आलेले आहे. शास्त्रज्ञांच्या मते प्राण्यांना याबाबत माहिती मिळू शकते. श्वान, पक्षी, मासे आणि कीटक यांना असामान्य हालचाली आधीच जाणवतात. त्यामुळे साप आणि उंदीर अनेकदा भूकंप होण्यापूर्वी बिळातून बाहेर पडतात. पक्षीही घरटे सोडतात आणि श्वान भुंकू लागतात.

प्राण्यांना धोका कसा समजतो?

प्राण्यांना पृथ्वीच्या आतून येणारी कंपने, वातावरणाच्या दाबात झालेला बदल, आर्द्रता याबाबत माहिती समजते. त्यामुळे घटना घडण्यापूर्वी ते सुरक्षित ठिकाणी जातात. 2004 मध्ये भारताच्या कुड्डालोर किनाऱ्यावर त्सुनामी आली होती, यात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता, मात्र त्यावेळी अनेक म्हशी, शेळ्या आणि श्वान सुरक्षित ठिकाणी पोहोचले होते. त्यामुळे प्राण्यांनी दिलेली चेतावणीकडे दुर्लक्ष करू नका.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा