AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्वानामुळे वाचला 67 लोकांचा जीव, नेमकं काय घडलं? वाचा…

एका श्वानामुळे तब्बल 67 लोकांचा जीव वाचला आहे. दुर्घटनेपूर्वी एका श्वानाने इशारा दिला होता, त्यामुळे जीवितहानी टळली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

श्वानामुळे वाचला 67 लोकांचा जीव, नेमकं काय घडलं? वाचा...
| Updated on: Jul 09, 2025 | 7:07 PM
Share

काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सियाठी गावात भूस्खलन झाले होते. यामुळे संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. मात्र या घटनेत एका श्वानामुळे तब्बल 67 लोकांचा जीव वाचला आहे. या दुर्घटनेपूर्वी एका श्वानाने दिलेल्या इशाऱ्यामुळे लोकांचा जीव वाचला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

30 जूनच्या रात्री सियाठी गावात मुसळधार पाऊस पडत होता. गावातील लोक आरामात झोपले होते. मात्र त्या रात्री एका घरातील दुसऱ्या मजल्यावर असलेला एक श्वान अचानक जोरजोरात भुंकू लागला, यामुळे कुंटूंबीयांना जाग आली. लोक सुरुवातीला घाबरले, मात्र त्यांना घराच्या भिंतीला तडे गेल्याचे दिसले. यामुळे घरात पाणी भरायला सुरुवात झाली होती.

67 लोकांचे प्राण वाचले

यानंतर कुंटूंबाने श्वानाला सोबत घेतले आणि घराबाहेर पडत सुरक्षित ठिकाण गाठले. यावेळी लोकांनी शेजाऱ्यांनाही जागे केले आणी सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेले. काही वेळाने डोंगराचा एक मोठा भाग तुटून गावावर पडला. यात डझनभर घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली, मात्र या श्वानाच्या इशाऱ्यामुळे गावातील 67 लोकांचे प्राण वाचले. हे सर्व लोक सध्या मंदिरात आश्रय घेत आहेत.

प्राण्यांना नैसर्गिक आपत्तीची माहिती समजते

याआधीही अनेकदा प्राण्याची नैसर्गित आपत्तीची सूचना दिल्याचे समोर आलेले आहे. शास्त्रज्ञांच्या मते प्राण्यांना याबाबत माहिती मिळू शकते. श्वान, पक्षी, मासे आणि कीटक यांना असामान्य हालचाली आधीच जाणवतात. त्यामुळे साप आणि उंदीर अनेकदा भूकंप होण्यापूर्वी बिळातून बाहेर पडतात. पक्षीही घरटे सोडतात आणि श्वान भुंकू लागतात.

प्राण्यांना धोका कसा समजतो?

प्राण्यांना पृथ्वीच्या आतून येणारी कंपने, वातावरणाच्या दाबात झालेला बदल, आर्द्रता याबाबत माहिती समजते. त्यामुळे घटना घडण्यापूर्वी ते सुरक्षित ठिकाणी जातात. 2004 मध्ये भारताच्या कुड्डालोर किनाऱ्यावर त्सुनामी आली होती, यात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता, मात्र त्यावेळी अनेक म्हशी, शेळ्या आणि श्वान सुरक्षित ठिकाणी पोहोचले होते. त्यामुळे प्राण्यांनी दिलेली चेतावणीकडे दुर्लक्ष करू नका.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.