AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशी दिवाळी कुणाच्याच नशिबी येवू नये; बस मध्ये दिवे लावले आणि ड्रायव्हर, कंडक्टरच्या आयुष्याची राख झाली

दिवाळी दिवशी असं काही तरी घडेल याची या दोघांना कल्पनाही नव्हती.

अशी दिवाळी कुणाच्याच नशिबी येवू नये; बस मध्ये दिवे लावले आणि ड्रायव्हर, कंडक्टरच्या आयुष्याची राख झाली
| Updated on: Oct 25, 2022 | 11:15 AM
Share

रांची : प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाशाची उधळण करणारा सण म्हणजे दिवाळी. दिवे लावून दिवाळी साजरी केली आहे. मात्र, याच दिव्यांनी घात केल्याची घटना झारखंडमध्ये घडली आहे. ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी बसमध्ये दिवे लावले. मात्र, याच दिव्यांमुळे त्यांचे आयुष्य राख झाले आहे. बसने पेट घेतल्याने आगीत होरपळून या दोघांचा मृत्यू झाला आहे. दिवाळी दिवशी असं काही तरी घडेल याची या दोघांना कल्पनाही नव्हती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहरात ही घटना घडली आहे.रांची लोअर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील खडगर्हा बसस्थानकात ही थरारक घटना घडलेय. बसमध्ये झोपलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा जळून मृत्यू झाला आहे.

ही बस नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी आपल्या इच्छित स्थळी रवाना होणार होती. यामुळे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी लक्ष्मीपूजनच्या दिवाळीच्या रात्री बसमध्ये पूजा केली.

देवाच्या मूर्तीची पूजा करुन त्यांनी बसमध्ये दिवे लावले. पूजा झाल्यावर दोघेही जवले आणि नेहमीप्रमाणे बसमध्ये झोपले. काही वेळातच त्यांना गाढ झोप लागली.

बसमध्ये लावेल्या दिव्याच्या ज्योतीने आग पेटली. काही मिनिटांतच संपूर्ण बस आगीच्या कचाट्यात सापडली.बसला चारही बाजूने आगीने वेढले. आगीच्या झळांमुळे ड्रायव्हर आणि कंडक्टरला जाग आली. मात्र, बस पूर्णपणे पेटली अससल्याने त्यांना बसमधून बाहेर पडता आले नाही. या घटनेत दोघेही जिवंत जाळले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

मात्र, तोपर्यंत बस आगीत जळून खाक झाली होती. पोलिसांनी घटनास्थळ दोन्ही अर्धवट जळालेले मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Follow Us
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.