AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघात पोटनिवडणूक होणार की नाही?, निवडणूक आयोगाचं थेट विधान; आता पुढे काय?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. तूर्तास वायनाडमध्ये पोटनिवडणूक घेण्याची घाई नाही, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघात पोटनिवडणूक होणार की नाही?, निवडणूक आयोगाचं थेट विधान; आता पुढे काय?
rahul gandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 29, 2023 | 3:21 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. दोन वर्षाची शिक्षा झाल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. त्यामुळे वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पोटनिवडणूक झाली तर राहुल गांधी या निवडणुकीला उभे राहणार की नाही? असा सवालही केला जात आहे. ही सर्व चर्चा सुरू असतानाच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राहुल गांधी यांना दिलासा देणारं विधान केलं आहे. तूर्तास काहीच घाई नाही. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे, असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.

वायनाड संसदीय दलातील व्हॅकेन्सी 23 मार्चपर्यंत अधिसूचित करण्यात आली आहे. कायद्यानुसार या ठिकाणी सहा महिन्याच्या आत पोटनिवडणूक झाली पाहिजे. कायद्यानुसार कार्यकाळ जर एक वर्षापेक्षा कमी असेल तर निवडणुका घ्यायच्या नसतात. पण वायनाडप्रकरणात लोकसभेचा कार्यकाळ एक वर्षापेक्षा अधिक आहे, असं राजीव कुमार यांनी सांगितलं. राजीव कुमार यांनी हे विधान केल्याने राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्यांना आता लवकरात लवकर सुरत कोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावं लागणार आहे. उच्च न्यायालयात याचिका सादर केल्यानंतर कोर्ट काय निर्णय देते यावर सर्व अवलंबून असणार आहे.

काय झालं होतं?

2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी 13 एप्रिल 2019मध्ये राहुल गांधी यांची कर्नाटकातील कोलार येथे जाहीर सभा होती. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. सर्व चोरांची आडनाव मोदीच का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधी यांच्या या विधानाने मोदी समाजाचा अवमान झाल्याचं सांगत भाजपचे गुजरातमधील आमदार पूर्णेश मोदी यांनी सुरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केलो होती. मोदी समाजाचा अपमान झाला आहे. त्यामुळे आम्हाला मान खाली घालून जावं लागतं, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता. तर मी हेतुपुरस्सर हे विधान केलं नाही. मला कोणत्याही समाजाचा अपमान करायचा नव्हता. मी व्यक्तीवर टीका केली होती, समाजावर नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता.

चार वर्ष या प्रकरणावर सुनावणी सुरू होती. अखेर त्यावर सुरत कोर्टाने निकाल देत राहुल गांधी यांना दोषी ठरवले. तसेच राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे लोकसभा सचिवालयाने लोकप्रतिनिधी कायद्यानुसार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. तसेच लोकसभा आवास समितीने त्यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेशही दिले होते. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर वायनाडमध्ये पोटनिवडणुका होतील का? झाल्या तर कधी होतील? असा सवाल केला जात होता.

Follow Us
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?