AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी गाव झालं प्रकाशमान ! नैनीतालमधील या गावात आली वीज

नैनितालमधील गोरिया देव गावातील टोक ग्वाल देव येथे पहिल्यांदाच वीज आल्याने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनास झाला आहे. राकेश नैनवाल आणि खासदार निधीच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. दुर्गम डोंगराळ भागातून वीजवाहिन्या टाकून घरांपर्यंत वीज पोहोचवण्यात आली असून, आता रस्ते बांधणीचे आश्वासनही मिळाले आहे.

स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी गाव झालं प्रकाशमान ! नैनीतालमधील या गावात आली वीज
स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी गाव झालं प्रकाशमान !
| Updated on: Mar 30, 2026 | 12:30 PM
Share

देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 7 दशकं झाली, मात्र 78 वर्षांनीही देशातील काही गावांत वीजेचा मागमूस नव्हता. नैनीताल विधानसभा क्षेत्रातील गोरिया देव गावच्या टोक ग्वाल देव येथेही अशीच काहीशी परिस्थिती होती. मात्र आता जवळपास 78 वर्षांनी वीज आल्याने हे गाव प्रकाशमान झाल्याने, गावकरी आनंदित झाले आहेत. वीजेसारख्या मूलभूत सुविधांपासून दीर्घकाळापासून वंचित असलेल्या गावकऱ्यांसाठी (वीज येणं) हे एका स्वप्नपूर्तीसारखं आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री राकेश नैनवाल यांच्या प्रयत्नांमुळे हे काम शक्य झाले. त्यांनी खासदार अजय भट्ट यांच्या खासदार निधीतून गावाला वीजपुरवठा मिळवून देण्याचं काम केलं.

अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही, वीज विभागाच्या पथकाने उंच डोंगरांमधून अडीच किलोमीटरची वीज वाहिनी टाकली आणि भूपाल सिंग नेगी, गोविंद सिंग नेगी व राम सिंग नेगी यांच्या घरांपर्यंत वीज पोहोचवली. गावात वीज पोहोचल्यानंतर मी गावाला स्वतः भेट देईन, असा संकल्प केला होता, अखेर आता हे काम पूर्ण झालं, असं राकेश नैनवाल यांनी नमूद केलं. हे काम सरकारच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. त्यांनी नैनितालचे खासदार अजय भट्ट यांचा विशेष उल्लेख केला, या दुर्गम भागात वीजपुरवठा खासदार विकास निधीमुळे (MPLADS) शक्य झाला असंही त्यांनी सांगितलं.

कित्येक वर्षांनी वीज आल्याने गावातील सर्व कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यादरम्यान राकेश नैनवाल यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिलं की, गावापर्यंत लवकरच रस्त्याची जोडणी देखील करून दिली जाईल. खासदारांशी चर्चा करून रस्ता बांधणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असं ते म्हणाले.

माजी प्रमुख राजू नेगी यांनी या प्रसंगी विशेष सहकार्य केले. सरपंच बालम नेगी, किसान मोर्चा कार्यकर्ते ललित नेगी, ज्येष्ठ नेते हरीश बेलवाल, माजी मंडी उपाध्यक्ष मन सिंग रावत, वीज विभागाचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी दीपक पाठक, चंदन जलाल आणि इतर अनेक ग्रामस्थही उपस्थित होते.

Follow Us
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.