AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी गाव झालं प्रकाशमान ! नैनीतालमधील या गावात आली वीज

नैनितालमधील गोरिया देव गावातील टोक ग्वाल देव येथे पहिल्यांदाच वीज आल्याने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनास झाला आहे. राकेश नैनवाल आणि खासदार निधीच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. दुर्गम डोंगराळ भागातून वीजवाहिन्या टाकून घरांपर्यंत वीज पोहोचवण्यात आली असून, आता रस्ते बांधणीचे आश्वासनही मिळाले आहे.

स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी गाव झालं प्रकाशमान ! नैनीतालमधील या गावात आली वीज
स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी गाव झालं प्रकाशमान !
| Updated on: Mar 30, 2026 | 12:30 PM
Share

देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 7 दशकं झाली, मात्र 78 वर्षांनीही देशातील काही गावांत वीजेचा मागमूस नव्हता. नैनीताल विधानसभा क्षेत्रातील गोरिया देव गावच्या टोक ग्वाल देव येथेही अशीच काहीशी परिस्थिती होती. मात्र आता जवळपास 78 वर्षांनी वीज आल्याने हे गाव प्रकाशमान झाल्याने, गावकरी आनंदित झाले आहेत. वीजेसारख्या मूलभूत सुविधांपासून दीर्घकाळापासून वंचित असलेल्या गावकऱ्यांसाठी (वीज येणं) हे एका स्वप्नपूर्तीसारखं आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री राकेश नैनवाल यांच्या प्रयत्नांमुळे हे काम शक्य झाले. त्यांनी खासदार अजय भट्ट यांच्या खासदार निधीतून गावाला वीजपुरवठा मिळवून देण्याचं काम केलं.

अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही, वीज विभागाच्या पथकाने उंच डोंगरांमधून अडीच किलोमीटरची वीज वाहिनी टाकली आणि भूपाल सिंग नेगी, गोविंद सिंग नेगी व राम सिंग नेगी यांच्या घरांपर्यंत वीज पोहोचवली. गावात वीज पोहोचल्यानंतर मी गावाला स्वतः भेट देईन, असा संकल्प केला होता, अखेर आता हे काम पूर्ण झालं, असं राकेश नैनवाल यांनी नमूद केलं. हे काम सरकारच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. त्यांनी नैनितालचे खासदार अजय भट्ट यांचा विशेष उल्लेख केला, या दुर्गम भागात वीजपुरवठा खासदार विकास निधीमुळे (MPLADS) शक्य झाला असंही त्यांनी सांगितलं.

कित्येक वर्षांनी वीज आल्याने गावातील सर्व कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यादरम्यान राकेश नैनवाल यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिलं की, गावापर्यंत लवकरच रस्त्याची जोडणी देखील करून दिली जाईल. खासदारांशी चर्चा करून रस्ता बांधणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असं ते म्हणाले.

माजी प्रमुख राजू नेगी यांनी या प्रसंगी विशेष सहकार्य केले. सरपंच बालम नेगी, किसान मोर्चा कार्यकर्ते ललित नेगी, ज्येष्ठ नेते हरीश बेलवाल, माजी मंडी उपाध्यक्ष मन सिंग रावत, वीज विभागाचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी दीपक पाठक, चंदन जलाल आणि इतर अनेक ग्रामस्थही उपस्थित होते.

Follow Us
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?.
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ......
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ.......
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील.
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल....
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल.....