Monsoon : मान्सून व्यापतोय महाराष्ट्र..! 15 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, कुठे रिमझिम कुठे मुसळधार? वाचा सविस्तर

राज्यात मान्सून सक्रीय झाल्याचा दावा हवामान विभागाकडून केला जात असला तरी मराठवाडा अजूनही कोरडाठाक आहे. उलट ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. विभागातील अनेक जिल्ह्यात अजून पावसाला सुरवात देखील झालेली नाही. पण आता चित्र बदलणार असल्याचे सांगितले जात आहे.

Monsoon : मान्सून व्यापतोय महाराष्ट्र..! 15 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट', कुठे रिमझिम कुठे मुसळधार? वाचा सविस्तर
मुंबईकरांनो सावधान, समुद्रकिनारी जाऊ नका
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 4:25 PM

मुंबई : मान्सून महाराष्ट्रात सक्रीय झाल्याचे (Weather department) हवामान विभागाकडून सांगण्यात येत असले तरी पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळेच अनेक भागात अजून (Agricultural cultivation) शेती मशागतीसाठी आवश्यक असलेला पाऊसही झालेला नाही. मात्र, जून महिन्याच्या अंतिम टप्प्यात पावसाचे स्वरुप बदलत असल्याचे संकेत हवामान विभागाकडून दिले जात आहेत. शनिवारपासून (Maharashtra) राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे तर दक्षिण कोकणात तर सोमवारपासून अति मुसळधार पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातून महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून आता गुजरातकडे आगेकूच करीत आहे.

या जिल्ह्यांना आहे ‘यलो अलर्ट’

हंगामाच्या सुरवातीपासूनच मान्सूने निराशा केलेली आहे. आतापर्यंतच्या तीन आठवड्यात मान्सून सक्रीय झाला पण बरसलाच नाही अशी स्थिती आहे. पण शनिवारपासू वातावरणासह पावसामध्येही बदल होणार असल्याचे संकेत आहे. त्यामुळेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट तर सिंधुदुर्गला 18 ते 21 जून आणि रत्नागिरीला 20 ते 21 जून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

मराठवाड्याला मिळणार का दिलासा?

राज्यात मान्सून सक्रीय झाल्याचा दावा हवामान विभागाकडून केला जात असला तरी मराठवाडा अजूनही कोरडाठाक आहे. उलट ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. विभागातील अनेक जिल्ह्यात अजून पावसाला सुरवात देखील झालेली नाही. पण आता चित्र बदलणार असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारपासून मराठवाडा, विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस बरणार आहे. त्यामुळे वातावरणात बदल होऊन खरीप पेरण्या मार्गी लागतील अशी आशा आहे.

कोकणामध्ये अति मुसळधार बरसणार

मान्सूनचे राज्यात आगमन झाल्यापासून थोड्याबहुत प्रमाणात कोकणालाच दिलासा मिळाला आहे. त्यानंतर मुंबई आणि उपनगरात बरसलेल्या पावसाने उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही आगमन केले आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर कायम अवकृपा राहिलेली आहे. आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाने हजेरी लावली तर रखडलेली शेतीकामे वेगात होणार आहेत. 18 जूननंतर मराठवाडा, विदर्भ मध्यम ते जोरधार तर कोकणात अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.