AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : मान्सून व्यापतोय महाराष्ट्र..! 15 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, कुठे रिमझिम कुठे मुसळधार? वाचा सविस्तर

राज्यात मान्सून सक्रीय झाल्याचा दावा हवामान विभागाकडून केला जात असला तरी मराठवाडा अजूनही कोरडाठाक आहे. उलट ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. विभागातील अनेक जिल्ह्यात अजून पावसाला सुरवात देखील झालेली नाही. पण आता चित्र बदलणार असल्याचे सांगितले जात आहे.

Monsoon : मान्सून व्यापतोय महाराष्ट्र..! 15 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट', कुठे रिमझिम कुठे मुसळधार? वाचा सविस्तर
मुंबईकरांनो सावधान, समुद्रकिनारी जाऊ नका
| Updated on: Jun 18, 2022 | 4:25 PM
Share

मुंबई : मान्सून महाराष्ट्रात सक्रीय झाल्याचे (Weather department) हवामान विभागाकडून सांगण्यात येत असले तरी पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळेच अनेक भागात अजून (Agricultural cultivation) शेती मशागतीसाठी आवश्यक असलेला पाऊसही झालेला नाही. मात्र, जून महिन्याच्या अंतिम टप्प्यात पावसाचे स्वरुप बदलत असल्याचे संकेत हवामान विभागाकडून दिले जात आहेत. शनिवारपासून (Maharashtra) राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे तर दक्षिण कोकणात तर सोमवारपासून अति मुसळधार पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातून महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून आता गुजरातकडे आगेकूच करीत आहे.

या जिल्ह्यांना आहे ‘यलो अलर्ट’

हंगामाच्या सुरवातीपासूनच मान्सूने निराशा केलेली आहे. आतापर्यंतच्या तीन आठवड्यात मान्सून सक्रीय झाला पण बरसलाच नाही अशी स्थिती आहे. पण शनिवारपासू वातावरणासह पावसामध्येही बदल होणार असल्याचे संकेत आहे. त्यामुळेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट तर सिंधुदुर्गला 18 ते 21 जून आणि रत्नागिरीला 20 ते 21 जून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्याला मिळणार का दिलासा?

राज्यात मान्सून सक्रीय झाल्याचा दावा हवामान विभागाकडून केला जात असला तरी मराठवाडा अजूनही कोरडाठाक आहे. उलट ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. विभागातील अनेक जिल्ह्यात अजून पावसाला सुरवात देखील झालेली नाही. पण आता चित्र बदलणार असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारपासून मराठवाडा, विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस बरणार आहे. त्यामुळे वातावरणात बदल होऊन खरीप पेरण्या मार्गी लागतील अशी आशा आहे.

कोकणामध्ये अति मुसळधार बरसणार

मान्सूनचे राज्यात आगमन झाल्यापासून थोड्याबहुत प्रमाणात कोकणालाच दिलासा मिळाला आहे. त्यानंतर मुंबई आणि उपनगरात बरसलेल्या पावसाने उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही आगमन केले आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर कायम अवकृपा राहिलेली आहे. आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाने हजेरी लावली तर रखडलेली शेतीकामे वेगात होणार आहेत. 18 जूननंतर मराठवाडा, विदर्भ मध्यम ते जोरधार तर कोकणात अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.