AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परिवारवादाने पवार आणि ठाकरे यांचा पक्ष तोडला, पीयूष गोयल यांचा घणाघात

महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरु असताना टीव्ही 9 भारतवर्षने सत्ता संमेलन कार्यक्रमात दिग्गज राजकीय नेत्यांना बोलते केले आहे. या कार्यक्रमात भाजपा नेते, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी महायुती डबल इंजिन सरकार ताकदीने महाराष्ट्रात येईल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

परिवारवादाने पवार आणि ठाकरे यांचा पक्ष तोडला, पीयूष गोयल यांचा घणाघात
| Updated on: Oct 28, 2024 | 10:38 PM
Share

राजकीय पक्ष कोणा एका कुटुंबाच्या मालकीचे नसतात तर त्यांची एक घटना असते. पक्षांवर कार्यकर्त्यांच्या अधिकार सर्वाधिक असतो. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी परिवार म्हणजेच पक्ष असा विचार केल्याने त्यांच्या परिवारवादानेच त्यांचा पक्ष तोडला गेला असा घणाघात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज येथे केला. टीव्ही 9 भारतवर्ष सत्ता संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते.

पीयूष गोयल पुढे म्हणाले की खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी आमच्याकडे आली आहे. कारण महायुतीत राहाण्याचा निर्णय शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या 40-40 आमदारांनी घेतला आहे. त्यामुळे शिवसेना खरी तर आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी तोडली असल्याचे त्यांनी सांगितले. मधल्या काळात अडीच वर्षे महाविकास आघाडीने सरकारच्या योजना थांबवल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्राचा विकास थांबला होता. परंतू आता पुन्हा महायुतीच्या सरकारने अर्थव्यवस्था रुळांवर आणली आहे. देशात तिसऱ्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले आहे. हरयाणात भाजपाचा मोठा विजय झाला आहे. लोकसभेत आम्ही 11 सिट फार कमी मार्जिनने हरलो आहोत. परंतू आता महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिन सरकार येणार असल्याचे पीयुष गोयल यांनी सांगितले. भारताचे लोक तृष्टीकरणाच्या आणि नकारात्मक राजकारणाला कंटाळलेले आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला विकास करायचा असल्याचेही पीयूष गोयल यांनी सांगितले.

फडणवीस यांनी स्मुथ टेक ऑफ घेतलेय

गेले दीड महिन्यांपासून मी महाराष्ट्रात फिरत आहे. आणि महायुतीने लाडकी बहीण सारखे घेतलेल्या निर्णयाने त्यामुळे महिलांचे सशक्तीकरण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येईल अशा विश्वास भाजपाच्या नेत्या माजी खासदार पूनम महाजन यांनी यावेळी सांगितले. एकीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन जे वाद सुरु आहेत. ते पाहता महायुती मजबूत स्थितीतू असून देवेंद्र फडणवीस यांनी स्मुथ टेक ऑफ घेतल्याचे पूनम महाजन यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा
धनुष्यबाण आमचाच... नाही मिळालं तर गोठवलं जाईल; ठाकरेंचा मोठा दावा
मोठी बातमी! धनुष्यबाण आमचाच... नाही मिळालं तर गोठवलं जाईल; सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
CJP सह अनेक संस्थांचं टेन्शन वाढलं; विदेशी फंडिंगच्या दाव्यानंतर...
CJP सह अनेक संस्थांचं टेन्शन वाढलं; विदेशी फंडिंगच्या दाव्यानंतर गृहराज्यमंत्र्यांचे थेट आदेश...
आता अजित डोवाल यांचे तरुणांवर मोठे विधान, म्हणाले, तरुणांनी...
Ajit Doval Speech | आता अजित डोवाल यांचे तरुणांवर मोठे विधान, म्हणाले, तरुणांनी...
झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?
Uddhav Thackeray | झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली...
Dhule Rain | 137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली, प्रशासनाचा अलर्ट जारी
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना...
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना दिलेल्या खास संदेशाची सर्वत्र चर्चा