AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fack Check : कृषी कायद्यांतर्गत खरंच शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावणार? वाचा सत्य

कृषी कायद्यातील त्रुटींविषयी बोलताना काही शेतकरी नेत्यांनी कृषी कायद्यामधील करारात शेती करणाऱ्या कंपन्या (Contract farming) देणगीदारांची जमीन हडप करतली असंही म्हटलं आहे.

Fack Check : कृषी कायद्यांतर्गत खरंच शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावणार? वाचा सत्य
| Edited By: | Updated on: Jan 06, 2021 | 8:58 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात (Farm Act) शेतकरी आंदोलनाचा आज 42 वा दिवस आहे. जोपर्यंत सरकार तिन्ही कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांकडून करण्यात आली आहे. यासाठी ट्रॅक्टर मोर्चाचीदेखील तयारी सुरू आहे. याच दरम्यान, कृषी कायद्यातील त्रुटींविषयी बोलताना काही शेतकरी नेत्यांनी कृषी कायद्यामधील करारात शेती करणाऱ्या कंपन्या (Contract farming) देणगीदारांची जमीन हडप करतली असंही म्हटलं आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी संतापाचं वातावरण आहे. पण हे नेमकं खरं आहे की खोटं? (farm act contract farming new law fact check kisan andolan latest news)

समोर आलेल्या अधिक तपासानंतर ही माहिती खोटी असल्याचं सांगण्यात येत आहे. कंत्राटी शेतीमध्ये कोणत्याही रकमेच्या वसुलीसाठी शेतकर्‍यांच्या शेतजमिनीवर कारवाई करता येणार नाही असं कृषी कायद्यामध्ये स्पष्टपणे लिहण्यात आलं आहे. यामध्ये शेतकर्‍यांच्या जमिनीच्या विक्री, भाडेतत्त्वावर देणं आणि तारणासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये करार हा समजूतीचा असणार आहे जमिनीचा नाही. डिसेंबर 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. आज आपण समजून घेऊयात नेमका सरकारने पारित केलेला कृषी कायदा काय आहे?, शेतकऱ्यांचा या कृषी कायद्याला विरोध का आहे?, दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे मुख्य चेहरे कोणते?, शेतकऱ्यांच्या मागण्या कोणत्या? तसंच सरकारची बाजू काय?

कोणते कृषी कायदे वादग्रस्त?

1) कृषी उत्पादने,व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020

2) हमी भाव व कृषी सेवांचा शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण ) करार कायदा 2020

3) जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा 2020

शेतकऱ्यांना चिंता कशाची?

1) हमी भाव राहील असे सरकार तोंडी म्हणतंय, त्याची खात्री नाही

2) सरकार हमी भावाने शेतमाल खरेदी करणे बंद करेल

3) खाजगी कंपन्या हमी भावाने शेतमाल घेतील याची खात्री नाही

4) कृषी कायद्यांमुळे खाजगी कंपन्यांची खरेदी दरात मनमानी होईल

5) 3% ग्रामीण पायाभूत सुविधा निधी यंदापासून राज्यांना बंद

6) शक्तीशाली कंपन्या शेतकऱ्यांचे शोषण करतील, फसवतील

शेतकऱ्यांच्या काय आहेत मागण्या?

1) तिन्ही कृषी कायदे मागे घ्या

2) हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी अपराध ठरवा

3) किमान हमी भावाचा कायदा करा

4) 3% ग्रामीण पायाभूत सुविधा निधी पुन्हा सुरु करा

5) सरकारकडून धान्य खरेदी चालूच ठेवा

6) कृषी क्षेत्रात भांडवलदारांना मनाई करा

7) राज्यांच्या वैधानिक अधिकारांचा सन्मान करा (farm act contract farming new law fact check kisan andolan latest news)

संबंधित बातम्या:

अहंकार सोडा, राजधर्म पाळा, कृषी कायदे मागे घ्या; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्ला

तब्बल 26 वर्षांनी मायावती-मुलायम एकत्र, भेटल्यानंतर काय म्हणाले?

(farm act contract farming new law fact check kisan andolan latest news)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.