AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बळीसाठी नेत असलेलं बोकड वाचलं, पण चौघांचा मृत्यू, कार थेट नदीत; काय घडलं?

पटेल कुटुंब पुजेनंतर बोकडाला बळी देण्यासाठी घेऊन निघाले होते. ते ज्या वाहनातून प्रवास करत होते, त्या भरधाव एसयूव्हीवरचा चालकाचा ताबा सुटला आणि हा अपघात घडला आहे.

बळीसाठी नेत असलेलं बोकड वाचलं, पण चौघांचा मृत्यू, कार थेट नदीत; काय घडलं?
प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 12, 2025 | 7:38 PM
Share

मध्य प्रदेशातल्या जबलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जबलपूर परिसरामध्ये एका कारचा एसयूव्हीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या घटनेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे बळीसाठी चालवलेला बोकड या अपघातातून वाचला आहे. चौघांचा मृत्यू झाला मात्र पूजेनंतर बळी देण्यासाठी जो बोकड या गाडीमधून घेऊन जात होते तो बोकड सुरक्षितरित्या वाचला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की पटेल कुटुंब पुजेनंतर बोकडाला बळी देण्यासाठी घेऊन निघाले होते. ते ज्या वाहनातून प्रवास करत होते, त्या भरधाव एसयूव्हीवरचा चालकाचा ताबा सुटला आणि ही कार पुलाचा कठाडा तोडून तब्बल तीस फूट खोल कोरड्या नदीत कोसळली. या घटनेत पटेल कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र ज्या बोकडाचा बळी दिला जाणार होता, ते बोकड या अपघातामधून वाचलं आहे.

चारगव्हाण- जबलपूर रस्त्यावर शुक्रवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. किशन पटेल वय 35, महेंद्र पटेल वय 35, सागर पटेल वय 17 आणि राजेंद्र पटेल वय 36 असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. तर जितेंद्र पटेल वय 36 आणि मनोज प्रातप हे दोघे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण नरसिंहपूरला गेले होते, तिथे बोकड आणि कोंबडं प्रतिकात्मकपणे अर्पण करून ते जबलपूरच्या दिशेनं परतत होते. घरी आल्यानंतर ते मटण आणि चिकणाचा कार्यक्रम करणार होते, मात्र वाटेतच काळानं घाला घातला.

बोकड सुरक्षित

हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. कोंबड्याचा देखील मृत्यू झाला. मात्र बळीसाठी जे बोकड घरी चालवलं होतं ते सुरक्षित आहे, या अपघातामध्ये फक्त त्याच्या कानाला जखम झाली आहे.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय