AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी राम जन्मभूमी आणि आता राम मंदिर? वनवास संपणार कधी? प्राणप्रतिष्ठा सोहळ्यालाही न्यायालयात आव्हान

अयोध्येच्या राम मंदिरात मंगळवारी रामललाचा अभिषेक सोहळा सुरू झाला. या काळात मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नीच्या नेतृत्वाखाली अनेक विधी पार पडले. मंगळवारपासून सुरू झालेल्या विधींची सांगता नवीन मंदिरातील रामललाच्या मूर्तीच्या अभिषेकाने होईल.

आधी राम जन्मभूमी आणि आता राम मंदिर? वनवास संपणार कधी? प्राणप्रतिष्ठा सोहळ्यालाही न्यायालयात आव्हान
RAM MANDIRImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jan 17, 2024 | 4:41 PM
Share

अलाहाबाद | 17 जानेवारी 2024 : अयोध्या येथील राम जन्मभूमीचा वाद सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर निकाला देत ही राम जन्मभूमी असल्याचा निकाल दिला. न्यायालयाच्या या निकालानंतर येथे आता भव्य असे राम मंदिर बांधण्यात येत आहे. येत 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. मात्र, या सोहळ्याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बंदी घालण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये मंगळवारी रामललाचा प्राणप्रतिष्ठा अभिषेक सोहळा सुरू झाला. यावेळी मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विधी पार पडले. एकीकडे हे विधी सुरु असतानाच आता 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील भोला दास यांनी ही याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेत असे म्हटले आहे की, ’22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. रामललाची मूर्ती निर्माणाधीन मंदिरात बसवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूजा करणार आहेत.

‘शंकराचार्य यांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. पौष महिन्यामध्ये कोणतेही धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत. मंदिर अद्याप पूर्ण झालेले नाही. अपूर्ण मंदिरामध्ये कोणतीही देवता विराजमान होत नाही. त्यामुळे हा प्राण प्रतिष्ठा सोहळा हा सनातन परंपरेविरोधात आहे असे या याचिकेमध्ये म्हटले आहे. तसेच, भारतीय जनता पक्षाने निवडणूक फायद्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचा दावाही यात करण्यात आला आहे.

दरम्यान, अयोध्येच्या राम मंदिरात मंगळवारी रामललाचा अभिषेक सोहळा सुरू झाला. या काळात मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नीच्या नेतृत्वाखाली अनेक विधी पार पडले. मंगळवारपासून सुरू झालेल्या विधींची सांगता नवीन मंदिरातील रामललाच्या मूर्तीच्या अभिषेकाने होईल.

राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे विधी सुरू झाले आहेत ते 22 जानेवारीपर्यंत चालतील. 11 पुजारी सर्व ‘देवी-देवतांना’ आमंत्रण देणारे विधी करत आहेत. मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि त्यांची पत्नी उषा मिश्रा हे या महिन्याच्या २२ तारखेपर्यंत चालणाऱ्या या विधीचे यजमान आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

Follow Us
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या घरी, राज्याच्या राजकारणात मोठं घडतंय?
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत ठाकरे
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत उद्धव ठाकरे हे काय म्हणाले?