AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangzeb : औरंगजेब एक टोपी कितीला विकायचा? टोप्या विकून त्याने किती कमाई केली?

काही ऐतिहासिक दस्ताऐवजानुसार औरंगजेब हा टोप्या विकून त्यातून आलेल्या पैशातून आपला दैनंदिन खर्च भागवत होता. तसेच यामधून जी बचत होईल, त्यातूनच आपले अंत्यसंस्कार व्हावेत अशी इच्छा देखील त्याने व्यक्त केली होती.

Aurangzeb : औरंगजेब एक टोपी कितीला विकायचा? टोप्या विकून त्याने किती कमाई केली?
AurangzebImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 09, 2026 | 9:32 PM
Share

मोघल बादशाहा औरंगजेब हा त्याच्या प्रदीर्घ राजवटीसाठी आणि लष्करी मोहिमांसाठी ओळखला जातो. मात्र काही ऐतिहासिक कागदपत्रांनुसार औरंगजेब याने त्याच्या दैनंदिन खर्चासाठी कधीही शासकीय खजानाचा वापर न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तो टोपी विनायचा, त्या विकून तो आपला दैनंदिन खर्च भागवत होता. या टोप्या विकून त्याने जी बचत केली आहे, त्याच पैशांमधून आपल्यावर अंत्यसंस्कार व्हावेत असे आदेश देखील त्याने दिले होते, असंही म्हटलं जातं. काही ऐतिहासिक दस्ताऐवजानुसार औरंगजेबचं असं म्हणणं होतं की, कधीही आपल्या वैयक्तिक खर्चासाठी शासकीय खजानाचा वापर केला गेला नाही पाहिजे. त्यामुळेच त्या काळात त्याच्या हातात सत्ता असताना देखील तो शासकीय खजान्यामधून एकही रुपया घेत नव्हता असं म्हटलं जातं. तो नेहमी टोपी विनायचा आणि त्या टोप्या विकून जे पैसे जमा होत होते, त्यातून तो आपला खर्च भागवत होता.

एका टोपीची किंमत किती?

काही इतिहासकारांच्या मते औरंगजेबाने त्याच्या हाताने विनलेली एक टोपी जवळपास 9 ते 10 आण्याला विकली जात होती. काही ऐतिहासिक दस्ताऐवजामध्ये तर ही टोपी त्या काळात तब्बल 4 ते 5 रुपयांना विकली जात होती, असा उल्लेख देखील आढळून येतो. औरंगजेबाने आपल्या हाताने तयार केलेल्या या टोप्या त्याच्या राज्यातील श्रीमंत लोक, त्याचे दरबारी लोक तसेच इतर राज्यातील श्रीमंत लोकं खरेदी करायचे असा उल्लेख आढळतो.

औरंगजेबाने टोप्या विकून किती पैसा कमावला?

औरंगजेबाने जवळपास 50 वर्ष राज्य केलं, त्याने या काळात शेकडो टोप्या विकल्या त्यातूनच तो आपला दैनंदिन खर्च भागवायचा असं मानलं जातं की जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा टोप्यांच्या विक्रीमधून त्याने 4 रुपये दोन आण्याची कमाई केली होती. त्याने याच बचतीमधून आपल्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत अशी इच्छा आपल्या मृत्यूपूर्वीच व्यक्त केली होती, त्यानंतर याच पैशांमधून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं मानलं जातं. तो आयुष्यभर टोप्या विनत होता.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा