AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी मुख्यमंत्री सोरेन यांची जेलमधून सुटका, ममता बॅनर्जी यांनी केले स्वागत

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी सोरेन यांना जामीन मंजूर केला. न्यायालयाने 13 जून रोजी सोरेन यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.

माजी मुख्यमंत्री सोरेन यांची जेलमधून सुटका, ममता बॅनर्जी यांनी केले स्वागत
HEMANT SORENImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jun 28, 2024 | 9:45 PM
Share

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगातून त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या पत्नी कल्पना त्यांच्या समर्थकांसह उपस्थित होत्या. 1 फेब्रुवारी रोजी हेमंत सोरेन यांची बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आता दीडशे दिवसांनी ते तुरुंगातून बाहेर आले आहेत. सोरेन तुरुंगातून बाहेर येताच मोठ्या संख्येने जेएमएम समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. हेमंत सोरेन यांनी हस्तांदोलन करून कार्यकर्त्यांचे स्वागत केले. तुरुंगातून सुटल्यानंतर सोरेन यांनी वडील आणि जेएमएमचे प्रमुख शिबू सोरेन यांचे आशीर्वाद घेतले.

न्यायमूर्ती रोंगॉन मुखोपाध्याय यांच्या एकल खंडपीठाने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती मुखोपाध्याय यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे, “अर्जदाराला 50 हजार रुपयांचे जामीन जातमुचलक आणि तत्सम रकमेच्या दोन जामिनावर जामिनावर सोडण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.” न्यायालयाच्या या निर्णयावर आनंद व्यक्त करताना झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी सोशल मीडियावर “सत्याचा त्रास होऊ शकतो पण पराभव होऊ शकत नाही. सत्यमेव जयते.” असे लिहिले आहे.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मिळाल्याबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आनंद व्यक्त केला. ममता यांनी X वर एका पोस्टमध्ये हेमंत सोरेन जामीनावर सुटल्यानंतर त्यांच्या पूर्ण राजकीय हालचालींना नक्कीच सुरुवात करतील, अशी आशा व्यक्त केली आहे. “झारखंडमधील आदिवासी नेते हेमंत सोरेन यांना एका प्रकरणामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांना आज हायकोर्टातून जामीन मिळाला आहे! यामुळे मी खूप खूश आहे. मला खात्री आहे की ते जामीन मिळवतील. हेमंत ताबडतोब त्याचे सार्वजनिक उपक्रम सुरू करतील, असे त्या म्हणाल्या आहेत.

राजदचे प्रवक्ते शक्ती सिंह यादव यांनीही ‘न्यायालयाचा निर्णय नेहमीच स्वागतार्ह असतो. आजही त्याचे स्वागत आहे. सत्यमेव जयते, सत्याचा विजय झाला. हेमंत सोरेन जे निवडून आलेले मुख्यमंत्री होते. त्यांना अपात्र सत्तेच्या जुलमी लोकांनी बनावट खटला रचून तुरुंगात टाकले. देशाच्या इतिहासातील हा अध्याय कोणीही विसरू शकत नाही असे म्हटले आहे.

हेमंत सोरेन यांची सुमारे आठ तास चौकशी केल्यानंतर 31 जानेवारी रोजी जमीन घोटाळ्यात ईडीने अटक केली होती. यानंतर ते ईडीच्या कोठडीत रात्री 8.30 वाजता राजभवनात पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. झारखंड उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती रंगन मुखोपाध्याय यांच्या न्यायालयाने हेमंत सोरेन यांच्या जामीन अर्जावर तीन दिवसांची चर्चा आणि सुनावणी पूर्ण केल्यानंतर 13 जून रोजी निर्णय राखून ठेवला होता. शुक्रवारी न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे वृत्त समजताच आघाडी सरकारमधील नेते आणि सोरेन यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट उसळली.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.