AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय म्हणताय, आता चक्क मुलींना मिळणार मोफत इलेक्ट्रीक स्कुटी

महिला दिनानिमित्त नाही तर एका सरकारी योजनेत मुलींना मोफत इलेक्ट्रीक स्कुटी देण्यात येणार आहे. या योजनेत ३० हजार विद्यार्थीनी पात्र ठरणार आहे.

काय म्हणताय, आता चक्क मुलींना मिळणार मोफत इलेक्ट्रीक स्कुटी
| Updated on: Feb 26, 2023 | 11:08 AM
Share

जयपूर : 8 मार्च जवळ आला आहे. विविध कंपन्या किंवा राज्य सरकारकडून महिला दिनानिमित्त विविध घोषणा केल्या जातात. महिलांनी कुठे सवलती मिळतात तर कुठे काहीतरी मोफतही. यामुळेच 8 मार्च निमित्त कुठे काय ऑफर आहे, याचा शोध महिला व मुलींनी सुरु केला आहे. परंतु महिला दिनानिमित्त नाही तर एका सरकारी योजनेत मुलींना मोफत इलेक्ट्रीक स्कुटी देण्यात येणार आहे. राजस्थान सरकारने मुलींना मोफत स्कुटी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही केली आहे. या योजनेत ३० हजार विद्यार्थीनी पात्र ठरणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व मुलींना आनंद झाला आहे.

राजस्थान सरकार काळीबाई भील योजनेत, १२वीत ६५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण आणणाऱ्या मुलींना स्कुटी देणार आहे. यापूर्वी २० हजार स्कुटी वाटपाचे सरकारचे उद्दिष्ट होते. आता बजेटमध्ये त्याची संख्या 10 हजार वाढवून 30 हजार करण्यात आली आहे.

महिलांचा प्रवास स्वस्त

राजस्थान रोडवेजमध्ये महिलांचा प्रवास आता स्वस्त झाला आहे. बजेटमध्ये भाड्यात 50 टक्के सूट देण्यात आली आहे. यापूर्वी ही सूट 30 टक्के होती. म्हणजेच पूर्वी महिलांना 70 टक्के भाडे भरावे लागत होते. आता ते निम्म्यावर आले आहे. त्याचबरोबर महिलांना त्यांच्या घरापासून कार्यालये आणि औद्योगिक भागात नेण्यासाठी महिला विशेष बससेवा सुरू करण्यात येणार आहे. हा सरकारचा चालू असलेला प्रकल्प आहे.

मुले-मुलींना मोफत प्रवास

सरकारी शाळांमध्ये ट्रान्सपोर्ट व्हाउचर योजना सुरू होणार आहे. याअंतर्गत मुलांना घर ते शाळा आणि शाळा ते घर असा 75 किलोमीटरचा प्रवास मोफत करता येणार आहे. या योजनेचा अनेक मुले व मुलींना होणार आहे.

Follow Us
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.