AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

attack on pakistan : पाकिस्तानं हादरलं, देशात मोठा हल्ला, थेट तेलाची रिफायनरीच उडवली

मोठी बातमी समोर येत आहे, पाकिस्तानवर मोठा हल्ला झाला आहे, या हल्ल्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या तेल रिफायनरीवर हा हल्ला करण्यात आला आहे.

attack on pakistan : पाकिस्तानं हादरलं,  देशात मोठा हल्ला, थेट तेलाची रिफायनरीच उडवली
पाकिस्तानवर हल्ला Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 23, 2026 | 12:43 PM
Share

पाकिस्तानातून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानवर अज्ञान शस्त्रधारी लोकांकडून मोठा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानात हाहाकार उडाला आहे. सध्या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यातच अमेरिका आणि इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केलं आहे. मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावामुळे आखाती देशांमधून जगभरात होणारा तेलाचा पुरवठा ठप्प झाला आहे. पाकिस्तानची तर अतिशय वाईट अवस्था आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा ठप्प झाल्यानं पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच आता दुष्काळात तेरावा महिना म्हणजे आता हा हल्ला नेमका पाकिस्तानच्या तेल रिफायनरीवरच करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये पारिस्तानचं मोठं नुकसान झालं असून, पुन्हा एकदा देशात मोठं ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलूचिस्तानच्या दरिग्वान परिसरात असलेल्या नॅशनल रिफायनरी लिमिटेडच्या प्लांटवर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार अचानक काही बंदुकधारी लोक रिफायनरी परिसरात घुसले आणि त्यांनी आंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. अचानक गोळीबार सुरू झाल्यानं या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं.

मात्र या हल्ल्यामध्ये तेल रिफायनरीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. नक्की किती नुकसान झालं याची माहिती समोर आलेली नाहीये. दरम्यान याची माहिती मिळताच पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने घटनास्थळी क्लियरंस ऑपरेशन सुरू केलं. क्लियरंस ऑपरेशन सुरू होताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र हा हल्ला नेमका कोणी केला? कशासाठी केला याची माहिती अजून समोर आलेली नाहीये. कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून अजून याची जबाबदारी घेण्यात आलेली नाही. मात्र अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आता पाकिस्तान सरकार अलर्ट मोडमध्ये आलं आहे. सर्व परिसरात नाकाबंदी केली असून, हल्लेखोरांचा शोध सुरू झाला आहे. या हल्ल्यामुळे चांगलीच दहशत पसरली आहे.

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.