AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : आता 5 दिवस पावसाचेच, विजांच्या कडकडाटासह बरसणार वरुणराजा, काय आहे हवामान विभागाचा अंदाज..?

वेळेपूर्वी दाखल होणारा मान्सून अजूनही मराठवाडा विभागात आलेला नाही. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात तर अजून मान्सूनपूर्व पावसानेही हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पेरण्या तर सोडाच पण शेतकरी अजूनही शेती मशागतीची कामेच करीत आहे. यंदा मान्सूनचे लवकर आगमन म्हणून बी-बियाणांची खरेदी करुन शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवण्यासाठी आतूर आहे.

Monsoon : आता 5 दिवस पावसाचेच, विजांच्या कडकडाटासह बरसणार वरुणराजा, काय आहे हवामान विभागाचा अंदाज..?
मान्सून
| Updated on: Jun 15, 2022 | 3:28 PM
Share

मुंबई : आतापर्यंत (Monsoon) मान्सून निम्म्या (Maharashtra) महाराष्ट्रात दाखल झाला असला तरी पूर्ण क्षमतेने सक्रिय झालेला नाही. कोकणातून दाखल झालेला मान्सून मुंबई, उपनगर आणि उत्तर महाराष्ट्रात बरसला असला तरी मराठवाड्याकडे त्याने पाठच फिरवलेली आहे. (Marathwada) मराठवाड्यात 14 जूनच्या सरासरीप्रमाणे केवळ 6.37 टक्के पाऊस झाला आहे. अनेक जिल्ह्यांना तर आणखीन हंगामपूर्व पावसाची प्रतीक्षा आहे. हे सर्व असले तरी आगामी 5 दिवसांमध्ये चित्र बदलू शकते. कारण पुढील पाच दिवसांमध्ये मध्य प्रदेशासह विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य नसल्याने खरिपाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत.

कसा राहणार पावसाचा प्रवास?

10 जून रोजी कोकणातून राज्यात दाखल झालेला पाऊस कोकण आणि परिसर वगळता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे फिरकलेलाच नाही. असे असताना आता भारतीय हवामान विभागाने 15 जून ते 19 जूनच्या मुसळधार पावसाचे संकेत दिले आहेत. 15 ते 17 जून या कालावधीत पूर्व मध्य प्रदेशात हा पाऊस बरसणार आहे. तर त्यानंतर 19 जून रोजी मान्सून विदर्भाकडे आगेकूच करणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस आता पावसाचे राहणार असून लवकरच हा मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मराठवाड्याची निराशा

वेळेपूर्वी दाखल होणारा मान्सून अजूनही मराठवाडा विभागात आलेला नाही. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात तर अजून मान्सूनपूर्व पावसानेही हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पेरण्या तर सोडाच पण शेतकरी अजूनही शेती मशागतीची कामेच करीत आहे. यंदा मान्सूनचे लवकर आगमन म्हणून बी-बियाणांची खरेदी करुन शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवण्यासाठी आतूर आहे. पण पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग मात्र कायम आहेत. आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत केवळ 6. 37 टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे.

उत्तर महाराष्ट्रात समाधानकारक

राज्यात प्रत्येक विभागात पावसाचे वेगळे चित्र आहे. कोकणात पावसाने जोर धरला असला तरी राज्यात जसे-जसे पुढे सरकताल तसा वेग मंदावला आहे. मात्र, नाशिक जिल्ह्याातील मालेगाव, येवला या तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मशागतीची कामे झालेल्या क्षेत्रात आता खरिपाची पिके घेतली जाऊ लागली आहेत. आगामी काळात राज्यात सर्वत्र पाऊस सक्रीय झाला तरच वेळेत पेरण्या होणार आहेत.

Follow Us
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......