AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओडीशा ट्रेन अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसदारांना मिळेल 22 लाखांची मदत, कशी ती पाहा

रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की रेल्वेचे तिकीट काढताना ज्यांनी ट्रॅव्हल इंश्युरन्सचा पर्याय निवडला होता. त्यांना विम्याचे दहा लाख रुपये अतिरिक्त मिळतील.

ओडीशा ट्रेन अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसदारांना मिळेल 22 लाखांची मदत, कशी ती पाहा
odisha-train-accidentImage Credit source: socialmedia
| Updated on: Jun 03, 2023 | 8:52 PM
Share

मुंबई : ओडीशाच्या बालासोर जिल्ह्यातील कोरोमंडल ट्रेन अपघातात जवळपास 288 जणांचा मृत्यू झाला आहे. दशकातील सर्वात भीषण अशा रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना रेल्वे आणि रिलीफ फंडातून आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच प्रवाशांनी तिकीट काढताना भारतीय रेल्वेच्या प्रवासी विम्याची निवड केली असल्यास 10 लाखाची आणखी मदत मिळण्याची तरदूत आहे. अशी एकूण 22 लाखांची आर्थिक मदत मिळणार आहे.

ओडीशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या तीन ट्रेनच्या विचित्र अपघातांत 288 जणांचे प्राण गेले आहेत. तर 900 हुन अधिक जण जखमी झाले आहेत. या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान कार्यालयातून मदतनिधीतून 2 लाख रुपयांचा निधी जाहीर झाला आहे. रेल्वे मंत्रालयातून 10 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. आधी रेल्वे अपघातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मिळायची आता ती 10 लाख करण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की रेल्वेचे तिकीट काढताना ज्यांनी ट्रॅव्हल इंश्युरन्सचा पर्याय निवडला होता. त्यांना विम्याचे दहा लाख रुपये अतिरिक्त मिळतील. परंतू आयआरसीटीसीने तिकीट काढताना दिलेला हा पर्याय ज्यांनी निवडला असेल त्यांनाच ही सुविधा प्राप्त होईल असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. ओडीशा राज्य देखील मृतांच्या वारसदारांना मदत जाहीर करु शकते असे म्हटले जात आहे.

जखमींनाही मिळणार मदत 

या भयानक अपघातात जखमींची संख्या 900 च्या आसपास आहे. जखमींसाठी पीएम मदतनिधीतून प्रत्येकी पन्नास हजार दिले जाणार आहेत. रेल्वे मंत्रालयातर्फे गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपये मिळतील. तसेच ट्रॅव्हल इंश्युरन्सचे प्रवाशांचा मृत्यू झाल्यास दहा लाख आणि आंशिक अपंगत्व आल्यास 7.5 लाख मिळतात. जर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असतील तर 2 लाखापर्यंत उपचार मोफत होतील.

असे मिळतील 22 लाख

रेल्वे अपघातातील बळींच्या नातलगांना रेल्वे दहा लाखांची मदत करते. तसेच ट्रॅव्हल इंशुरन्सचे तिकीट बुकींग करताना अत्यंत कमी रकमेत पर्याय निवडताच विमा उतरविण्याची सोय असते. केवळ 35 पैशात हा प्रवासी विमा आयआरसीटीसी उपलब्ध करते. त्यामुळे दहा लाखांचा अपघाती मृत्यू विमा मिळतो. परंतू हा विमा उतरविताना तिकीट काढताना नॉमिनीचे नाव लिहीले बंधनकारक आहे. म्हणजे विमा अधिकाऱ्यांना वारसदारांना जलद गतीने मदतीचे पैसे देता येतात.

तामिळनाडूची त्यांच्या नागरिकांना मदत

पीएम मदतनिधीचे 2 लाख , रेल्वे मंत्रालयाचे 10 लाख आणि तिकीट बुकींग करतानाचे 35 पैसे वाल्या इंश्युरन्सचे रक्कम जमेस धरल्यास एकूण 22 लाखाची मदत मिळू शकते. आयआरसीटीसीचा विमा ज्या कंपनीकडे आहे तिच्या कार्यालयात जाऊन त्यासाठी दावा केला जाऊ शकतो. दरम्यान, तामिळनाडूच्या प्रवाशांसाठी मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.