AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रानंतर या राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता? आमदार बंडखोरी करुन सरकार पाडणार

महाराष्ट्राच्या राजकारणात जसा भूकंप झाला तसाच भूकंप आणखी एका राज्यात होण्याची शक्यता आहे. चंपाई सोरेन यांनी आपले राजकीय हेतू स्पष्ट केले आहेत. ते नवीन मार्गाच्या शोधात आहे. अंतिम निर्णय होणे बाकी आहे. दुसरीकडे हेमंत सोरेन यांच्या सरकारबाबतही अनेक गोष्टी समोर येत आहेत. अशा स्थितीत हे समजून घेणे आवश्यक आहे की चंपाई सोरेने यांच्या बंडामुळे हेमंत सोरेन यांना नुकसान होईल की नाही?

महाराष्ट्रानंतर या राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता? आमदार बंडखोरी करुन सरकार पाडणार
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 19, 2024 | 7:46 PM
Share

महाराष्ट्राने दोन वेळा मोठी बंडखोरी पाहिली. पहिल्यांना एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि दुसऱ्यांदा अजित पवार यांनी ही बंडखोरी करत राज्यात राजकीय भूंकप घडवून आणला. इतकंच नाही तर दोघांना मुळ पक्ष मिळाला त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मोठा धक्का बसला. देशात पहिल्यांदाच असं काही घडलं. ज्यामुळे संपूर्ण देशात त्याची चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार गेल्याने ठाकरे सरकार कोसळलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि नंतर अजित पवार हे देखील ४० आमदार घेऊन महायुतीत आले आणि उपमुख्यमंत्री झाले. हेच चित्र आता झारखंडमध्ये पाहायला मिळत आहे. कारण येथे देखील एका नेत्याने पक्षातून बंडखोरीचे संकेत दिले आहेत. कोण आहेत चंपाई सोरेन जाणून घ्या.

चंपाई भाजपच्या संपर्कात?

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे सध्या भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं. पण दुसरीकडे ते एकला चलो रे ची भूमिका घेऊ शतकतील अशीही चर्चा आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे जुन्या फळीतील ते नेते आहेत. त्यांच्यासोबत काही आमदार जाऊ शकतात. त्यामुळे असं झालं तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं सरकार कोसळू शकतं. सध्याच्या परिस्थितीनुसार चंपाई सोरेन यांनी आपल्यासोबत कोणी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. रविवारी सकाळी झमुमोचे अनेक आमदार त्यांच्यासोबत असल्याची बातमी वेगाने पसरली होती.

घाटसिलाचे आमदार रामदास सोरेन, बहरघोराचे समीर मोहंती, खरसावनचे दशरथ गगराई, पोटकाचे संजीव सरदार ते हेमंतचे कॅबिनेट मंत्री दीपक बिरुवा अशी नावे पुढे आली. पण एकामागोमाग एक या सर्वांनी ती शक्यता नाकारली. सर्व प्रमुख नेत्यांनी जाहीरपणे आपली भूमिकाही मांडली.

हेमंत सोरेने सरकार पडणार का?

आता सत्ताधारी झामुमोचे आमदार पक्ष बदलणार नसल्याची माहिती आहे. आमदार हे पक्ष सोडून जाणार नसल्याचे ही स्पष्ट झाले आहे. चंपाई सोरेने यांनी आपली बाजू बदलली तरी देखील सरकारला धोका नसल्याचा दावा केला जात आहे. भाजपचे काही नेते अजूनही दावा करत आहेत की सहा आमदार हे पक्ष बदलू शकतात. पण कोणाचीही नावे उघड करण्यात आलेली नाहीत.

चंपाई सोरेन यांना काय मिळणार?

पक्ष बदलल्यानंतर चंपाई सोरेन यांना काय मिळणार याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने जर त्यांना सोबत घेतले तर याचा राजकीय परिणाम होऊ शकतो. आता असा दावा केला जात आहे की, त्यांच्यासह पुत्रालाही पसंतीची विधानसभेची जागा मिळणार आहे. चंपाई सोरेन या निमित्ताने आपला राजकीय वारसा पुढे नेण्याचा मार्ग मोकळा करणार आहेत. असे आश्वासन भाजपने दिले आहे. याबाबत अनेक बैठका देखील झाल्या आहेत. मध्यस्थीसाठी बंगालमधील भाजपच्या एका प्रमुख नेत्याची नियुक्ती करण्यात आल्याची देखील माहिती आहे.

चंपाई सोरेन यांच्याबाबत भाजप नेत्यांमध्ये ही संभ्रम आहे. कारण त्यांना पक्षात घेतलं तर मग जमशेदपूर आणि आजूबाजूच्या परिसरात सक्रिय असलेल्या नेत्यांची सर्वात मोठी समस्या आहे. चंपाई यांच्या बाजू बदलल्याने या जागांच्या समीकरणावर परिणाम होणार आहे.

चंपाई सोरेन सध्या सरायकेला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. भाजपला चंपाई सोरेन यांच्या मुलालाही जागा द्यावी लागेल, ज्यामुळे ती जागा मिळण्याची आशा असलेल्या नेत्यांना धक्का बसेल. अशा स्थितीत अलीकडच्या राजकीय घडामोडींमुळे हेराफेरीही होऊ शकते.

Follow Us
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य