AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी काय असतो निकष? भारतात आता किती राष्ट्रीय पक्ष?

भारतात कधी मिळतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेण्यात आला. कोणत्या पक्षाला मिळाला नवा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी काय असतो निकष? भारतात आता किती राष्ट्रीय पक्ष?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Apr 10, 2023 | 9:13 PM
Share

मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी (NCP) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा ( National Party ) निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. एकीकडे देशात आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष बनत असताना राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कधी दिला जातो. त्यासाठी निवडणूक आयोगाने काय निकष असतात. चला जाणून घेऊया.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी खालील निकषांपैकी एक निकष पूर्ण करावी लागते :

१. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते मिळाली पाहिजेत. लोकसभा निवडणुकीत कमीत कमी 4 जागा मिळाल्या पाहिजेत. २. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी 2% जागा मिळाल्या पाहिजेत आणि या जागा कमीत कमी 3 राज्यांमधून निवडून आल्या पाहिजेत. ३. पक्षाला कमीत कमी 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे.

प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी खालील निकषांपैकी एक निकष पूर्ण करावी लागते :

१. विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 2 जागा मिळाल्या पाहिजेत किंवा

२. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 1 जागा मिळाली पाहिजे किंवा

३. विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी 3% जागा किंवा कमीत कमी 3 जागा मिळाल्या पाहिजेत किंवा

४. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला राज्यातील 25 जागांमागे 1 जागा मिळाली पाहिजे किंवा

५. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 8% मते मिळाली पाहिजेत.

राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्याचे फायदे :

1) राखीव निवडणूक चिन्ह मिळते

2) पक्षाच्या कार्यालयासाठी subsidized दरांमध्ये जमीन मिळते.

3) दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर मोफत प्रक्षेपण होते.

4) निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचं मोफत वितरण होते.

भारतात आता 6 राष्ट्रीय पक्ष

बहुजन समाज पक्ष, भारतीय जनता पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट),काँग्रेस, नॅशनल पीपल्स पार्टी, आम आदमी पक्ष

Follow Us
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?