AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुपती बालाजीच्या पुजाऱ्यांना किती मिळते वेतन?, अशी केली जाते निवड ?

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थानातील प्रसाद म्हणून वाटल्या जाणाऱ्या लाडूतील घटक पदार्थावरुन वाद सुरु आहे. या मंदिराच्या पुजाऱ्यांचा थाट काही औरच असतो. त्यांचे वेतनाचे आकडे डोळे दीपविणारे आहेत.

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुपती बालाजीच्या पुजाऱ्यांना किती मिळते वेतन?, अशी केली जाते निवड ?
tirupati balaji temple
| Updated on: Sep 29, 2024 | 1:27 PM
Share

तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसाद म्हणून वाटल्या जाणाऱ्या लाडूत वापरल्या जाणाऱ्या तुपावरुन वाद सुरु आहे. देशातील सर्वाधित श्रीमंत मानल्या जाणाऱ्या या देवस्थानाच्या धार्मिक बाबींची जबाबदारी चार शक्तीशाली पुरोहितांच्या कुटुंबांकडे सोपविण्यात आली असून अनेक पिढ्यांपासून ते देवाची पूजाअर्चा करण्याचा मान त्यांना देण्यात आला आहे. या परिवारातील लोक रोज पहाटे पासून संध्याकाळपर्यंत धार्मिक अनुष्ठान करीत असतात. परंपरेनुसार मंदिराच्या ट्रस्टने या चार श्रीमंत कुटुंबांतील 23 लोकांना पुजारी म्हणून नियुक्त केलेले आहे. तर एकुण कर्मचाऱ्यांची संख्या 58 इतकी आहे.

ही चार कुटुंबे पाहातात कारभार

तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिराच्या धार्मिक अनुष्ठान आणि इतर धार्मिक पूजेची जबाबदारी चार मातब्बर घराणी करतात. दीपल्ली, गोल्लापल्ली, पेद्दिन्थी आणि तिरुपतम्मा ही चार कुटुंबे पिढ्यानुपिढ्या बालाजी मंदिराची पूजा करीत आली आहेत. तिरुमालाच्या श्री व्येंकटेश्वर स्वामी मंदिरात सर्व धार्मिक अनुष्ठानाची जबाबदारी यांच्यावर आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थानम ट्रस्टने विविध कार्यासाठी सुमारे 16,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ट्रस्टने मंदिरात 35 घराण्याच्या बाहेरील पुजाऱ्यांची देखील नियुक्ती केलेली आहे.

किती असते वेतन

मुख्य पुजाऱ्याला प्रताधन आराधक नावाने ओळखले जाते. त्यांची नियुक्ती वंशपरंपरागत पद्धतीने होत असते. त्यांना 82,000 रुपये दर महिना वेतन दिले जाते. अन्य मुख्य पुजारी देखील वंशपरंपरागत पद्धतीने नियुक्त केले जातात. त्यांना 52,000 मेहनताना आणि अन्य खर्च दिले जातात. वंशाबाहेरील पुजाऱ्यांना त्यांचा अनुभवानुसार 30,000 ते 60,000 वेतन दिले जाते.

सेवानिवृत्तीचा कालावधी

तिरुपती बालाजी  मंदिराच्या पुजाऱ्यांच्या निवाससाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते. त्यांना वेतना व्यतिरिक्त अन्य भत्ते देखील मिळतात. पुजाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 65 असते. त्यानंतर त्यांना सेवानिवृत्तीचा देखील लाभ दिला जातो. परंतू घराण्याच्या बाहेरी पुजाऱ्यांना मात्र सेवानिवृत्ती वेतन दिले जात नाही. या संदर्भात न्यायालयात प्रकरण गेलेले आहे.

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!