AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य पूर्वेतील युद्ध कसे थांबणार ? खामेनेई यांच्या प्रतिनिधींनी TV9 शी केली बातचीत

'सत्ता संमेलन' या कार्यक्रमात इराणचे सर्वोच्च नेत्याचे प्रतिनिधी आयतुल्लाह अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी सहभाग घेतला. ते म्हणाले की इराणने कधीही युद्धाची सुरुवात केलेली नाही. आम्हाला युद्ध नको, परंतू आमच्यावर युद्ध सोपवले जात आहे. युद्धाची सुरुवात अमेरिका आणि इस्राईलने केली आहे. आणि त्याचा शेवटही तेच करतील. इराण स्वत:साठी लढत आहे. त्याला न्याय हवा आहे.

मध्य पूर्वेतील युद्ध कसे थांबणार ? खामेनेई यांच्या प्रतिनिधींनी TV9 शी केली बातचीत
Ayatollah Abdul Majid Hakim Ilahi
| Updated on: Mar 24, 2026 | 6:58 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये सिजफायर व्हावी यासाठी व्हाईट हाईस प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. या दरम्याने भारतातील इराणचे सुप्रीम लीडर मोजताबा खामेनेईंचे प्रतिनिधींनी युद्ध कसे रोखता येईल या संदर्भात TV9 भारतवर्षशी बोलताना विस्तृत सांगितले. ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ‘या कार्यक्रमात बोलताना सर्वोच्च नेत्याचे प्रतिनिधी असलेल्या अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी म्हटले की अमेरिकेवर भरवसा करता येऊ शकत नाही त्यांचा इतिहास कलंकीत राहिलेला आहे.

इलाही यांच्या मते इराण युद्धविराम तेव्हाच करेन जेव्हा त्याच्यावर हल्ला होणार नाही. इराणवर जोपर्यंत अमेरिका आणि इस्राईलचा हल्ला होत राहील तोपर्यंत युद्ध संपू शकत नाही.

बलाढ्य देशांचा अहंकार तोडणे गरजेचे – इलाही

इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या प्रतिनिधी इलाही यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की असे कसे होऊ शकते की कोणताही कमजोर देश आहे ,त्याच्यावर ताकदवान देशाने हल्ला करावा ? जग हे का पाहात नाही ? आम्ही केवळ प्रत्युत्तर देत आहोत. आम्ही एकाही निर्दोषाचे रक्त वाहिलेले नाही.

इलाही यांच्या मते शांतता संपूर्ण जगासाठी गरजेची आहे. आम्हाला संपूर्ण मध्य पूर्वेत शांतता हवी आहे. लेबनॉन आणि गाझाचाही विषय घ्यावा, सिरीयाचाही विषय असावा. त्यांच्या जमीनीवर कोणी कब्जा केला आहे. त्यावरही चर्चा व्हायला हवी आहे.

मध्य पूर्वेत शांतता कशी येईल ?

इलाही म्हणाले की शांततेसाठी जगातील देशांनी आधी अमेरिकेवर दबाव आणावा. सर्वांनी हे निश्चित करायला हवे की येत्या काळात इराणवर कोणताही हल्ला होऊ नये. नुकसान झाले त्याची भरपाई द्यायला हवी. कारण इस्राईल आणि अमेरिकेने आमच्या शाळा नष्ट केल्या आहेत. हॉस्पिटल तोडले आहेत.

इलाही यांच्या मते इराण आपल्या प्रतिष्ठेशी तडजोड करणार नाही. आम्ही ते करु जे एक सार्वभौम राष्ट्र करते. बोलणी कशी होतील, हे सर्वाच्च नेते निश्चित करतील. परंतू इराणने सामंजस्य कराराची दशा आणि दिशा स्पष्ट केली आहे.

Follow Us
ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय पाटलांना आव्हाडांचा थेट इशारा
Jitendra Awhad | ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय दिना पाटलांना जितेंद्र आव्हाडांचा थेट इशारा
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलां
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलांचं थेट पोलीस आयुक्तांना आव्हान
राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच
Sanjay Dina Patil | राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच मग्रुरीची भाषा
राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं....
Sanjay Dina Patil | राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं पसरवलं जातंय म्हणत दिलं सडेतोड उत्तर
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात धक्कादायक खुलासा, आता...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी... राजकारणात मोठं घडतंय?
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर