AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिचं शीर धडावेगळं करून फ्रिजमध्ये ठेवलं, नव्या संसाराचा भयानक अंत; पतीच्या रागाने सगळंच उद्ध्वस्त!

3 सप्टेंबर रोजी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. दोघांमधील कडाक्याचे भांडण दुसऱ्या दिवसाच्या पहाटेपर्यंत सुरू होते. पुढे हे भांडण जास्तच वाढले. रागात आलेल्या रामानुजने रियाची थेट हत्या केली. त्याने रियाचे शीर धडापासून वेगळे करून फ्रिजमध्ये ठेवले.

तिचं शीर धडावेगळं करून फ्रिजमध्ये ठेवलं, नव्या संसाराचा भयानक अंत; पतीच्या रागाने सगळंच उद्ध्वस्त!
husband and wife clashImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 07, 2026 | 9:33 PM
Share

लग्नाला वर्षही पूर्ण झाले नसताना एका महिलेचा संसारच रक्तरंजित झाला. पतीने या महिलेची हत्या केली. तिच्या मृतदेहासोबत त्याने नंतर भयंकर कृत्य केले. हत्या करून धडापासून शीर वेगळे केले. पॉलिथीनच्या बॅगमध्ये शीर ठेवून नंतर ते फ्रिजमध्ये ठेवले. लग्नाला एक वर्षही झालेलं नसताना पतीने अशा प्रकारे पत्नीची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून पतीने गुन्हा कबुल केला आहे. अवैध लैंगिक संबंधाच्या संशयातून हे हत्याकांड घडले आहे.

पोलिसांना घराचा दरवाजा उघडाच दिसला, नंतर…

समोर आलेल्या माहितीनुसार मृत महिलेची ओळख रिया तालुकदार अशी झाली असून ती एका बुटीकमध्ये काम करत होती. तिचा पती रामानुज गोस्वामी हा कॅब चालक असल्याची होता. काही दिवसांपासून रिया तालुकदार आणि रामानुज गोस्वामी यांच्याशी कुटुंबीयांचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे चिंतेत असलेल्या नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. तक्रार आल्यानंतर हाटीगाव पोलीस ठाण्याचे पथक त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांना घराचा दरवाजा उघडाच दिसला. आत जाऊन पाहिल्यावर पोलिसांना रियाचा मृतदेह आढळून आला. सोबतच पोलिसांना तिचे शीर फ्रिजमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले आढळले, तर शरीराचा उर्वरित भाग घरात पडलेला दिसला. ही घटना समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली.

दरम्यान, आसाममधील गुवाहाटीतील बेलटोला परिसरात ही घटना घढली आहे. बायकोचा खून करून रामानुज स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने गुन्हा कबुल केला आहे. चौकशीदरम्यान त्याने पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून हे हत्याकांड घडवून आणल्याचे सांगितले.

पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली?

पोलिसांच्या माहितीनुसार, 3 सप्टेंबर रोजी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. दोघांमधील कडाक्याचे भांडण दुसऱ्या दिवसाच्या पहाटेपर्यंत सुरू होते. पुढे हे भांडण जास्तच वाढले. रागात आलेल्या रामानुजने रियाची थेट हत्या केली. त्याने रियाचे शीर धडापासून वेगळे करून फ्रिजमध्ये ठेवले. तर रियाचे धड घरातच पडलेले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेले धारदार शस्त्रही जप्त केले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात