AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर भारतही सापडणार मोठ्या संकटात, जगभरात बसणार मोठा हादरा

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे, जर समजा अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर भारत देखील मोठ्या संकटात सापडू शकतो. त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

जर अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर भारतही सापडणार मोठ्या संकटात, जगभरात बसणार मोठा हादरा
trump khamenei Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 22, 2026 | 9:39 PM
Share

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष चांगलाच शिगेला पोहोचला आहे, अमेरिकेनं मीडल इस्टमध्ये आपल्या दोन युद्ध नौका तैनात कल्या आहेत. सोबतच शेकडो फायटर जेट देखील अमेरिकेकडून पाठवण्यात आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडून वारंवार इराणवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. इराणवर मर्यादित सैन्य करावाई करून त्यांच्यावर अणु करार करण्यासाठी दबाव आणायचा असा विचार डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. मात्र दुसरीकडे या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते जर अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. मध्य पूर्वेतील अनेक देश युद्धाच्या तडाख्यात सापडू शकतात, तसंच अमेरिकेनं जर इराणवर हल्ला केला तर सध्या अमेरिकेचं इराणसोबत अणु करारावर बोलणं सुरू आहे, तो देखील पर्याय कायमचा बंद होऊ शकतो.

इराणच्या एका उच्चपदस्त अधिकाऱ्याच्या हवाल्यानं समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार जर अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर अमेरिका आणि इरामधील चर्चेचे सर्व दरवाजे बंद होऊ शकतात. तसंच इराण देखील अमेरिकेवर हल्ला करू शकतो. यामध्ये अमेरिकेचं देखील मोठं नुकसान होऊ शकतं. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आता दहा ते बारा दिवसांचा वेळ दिला आहे. तुमच्याकडे दहा दिवसांचा वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही निर्णय नाही घेतला तर इराणमध्ये भयंकर वाईट गोष्टी घडतील अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे इराण देखील मागे घेण्यास तयार नाहीये, इराणने ओमानच्या खाडीत रशियासोबत युद्ध सराव सुरू केला आहे.

दरम्यान जर अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झालं तर त्याचा मोठा परिणाम हा भारतावर देखील होऊ शकतो. भारतामध्ये मोठा ऊर्जा संकट निर्माण होऊ शकतं, कारण जर अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झालं तर मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण होईल, इराणने यापूर्वी देखील स्पष्ट केलं आहे, की आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही जागतिक ऊर्जा पुरवठ्याचा मार्ग असलेली होर्मुझची खाडी बंद करू, तसं झालं तर भारतासह जगावर मोठं संकट निर्माण होऊ शकतं, एवढंच नाही तर भारत ऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणात आखाती देशांवर अवलंबून आहे, त्यामध्ये देखील विस्कळीतपणा येऊ शकतो.

मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.