AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानशी बोलणी झालीच, तर फक्त पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर : राजनाथ सिंह

पाकिस्तानसोबत चर्चा व्हावी, असं काही जणांचं मत आहे. मात्र जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला थारा देणं थांबवत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्वरुपाची चर्चा होऊ शकत नाही, असं राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं.

पाकिस्तानशी बोलणी झालीच, तर फक्त पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर : राजनाथ सिंह
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Aug 18, 2019 | 5:19 PM
Share

कालका (हरियाणा) : पाकिस्तान (Pakistan) दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीही बोलणी होणार नाही. आता चर्चा व्हायची असेल, तर ती फक्त आणि फक्त पाकव्याप्त काश्मीर (PoK) या एकाच विषयावर होईल, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पाकिस्तानला दरडावलं आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काल्कामध्ये भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे, त्यावेळी राजनाथ सिंह बोलत होते.

‘कलम 370 (Article 370) आणि 35 ए (Article 35A) हटवल्यानंतर आमचा एक शेजारी बिथरला आहे. जगभरातील सर्व देशांचे दरवाजे तो ठोठावत आहे. पाकिस्तानसोबत चर्चा व्हावी, असं काही जणांचं मत आहे. मात्र जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला थारा देणं थांबवत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्वरुपाची चर्चा होऊ शकत नाही’ असं राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं.

‘भाजप केवळ सरकार बनवण्यासाठी नाही, तर देश बनवण्यासाठी राजकारण करत आहे. मोदींच्या नेतृत्वात कलम 370 आणि 35 ए हटवल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी, तसंच स्थानिक युवकांच्या भविष्याचा विचार करता त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात येत आहे’ असं राजनाथ यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.

‘भारत बालाकोटपेक्षाही मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. याचा अर्थ भारताने बालाकोटमध्ये हल्ला केला होता, हे पाकिस्तानला मान्य आहे’ असं म्हणत राजनाथ यांनी बालाकोट एअरस्ट्राईकचा उल्लेख केला.

Follow Us
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्...
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्... कर्तव्य बजवत असतानाच जवानाने संपवलं जीवन
मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार?
Sandeep Deshpande | मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार? संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला खोचक टोला
महापूर! नद्यामधील पाण्याची पातळी वाढली, ढगफुटीची शक्यता... धो धो धो
महापूर! नद्यामधील पाण्याची पातळी वाढली, ढगफुटीची शक्यता... धो धो धो बरसणार पाऊस; पुढील 24 तास...
संत तुकोबांच्या पालखीवर पावसाचं सावट! देहूत गर्दी करू नका
संत तुकोबांच्या पालखीवर पावसाचं सावट! देहूत गर्दी करू नका; सुनेत्रा पवारांचं मोठं आवाहन
मोठी बातमी! 19 तासांत हटवला 100 टन मलबा! मुंबई-पुणे महामार्ग पुन्हा...
मोठी बातमी! 19 तासांत हटवला 100 टन मलबा! मुंबई-पुणे महामार्ग पुन्हा झाला सुरू
दिल्लीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची धाव!; मंत्रिमंडळ विस्ताराच्या....
CM Devendra Fadnavis | दिल्लीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची धाव!; मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली?
गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; दुतोंड्या मारुतीपर्यंत...
Nashik Godavari River | गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; दुतोंड्या मारुतीपर्यंत पोहचलं पाणी; नाशिकला ढगफुटीचा इशारा
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!