AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही वनस्पती म्हणजे सापांचा कर्दनकाळच; घरातच काय परिसरात सुद्ध पुन्हा कधीच दिसणार नाही साप

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, पावसाळ्यामध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते, मात्र अशा काही वनस्पती आहेत, ज्यामुळे तुम्ही सापांना तुमच्या घरापासून दूर ठेऊ शकता.

ही वनस्पती म्हणजे सापांचा कर्दनकाळच; घरातच काय परिसरात सुद्ध पुन्हा कधीच दिसणार नाही साप
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 07, 2025 | 9:04 PM
Share

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, पावसाळ्यामध्ये सापांच्या बिळात पाणी घुसतं, त्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात आणि निवाऱ्यासाठी सुरक्षित जााग शोधण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा साप तुमच्या घरात असलेला अडागळीची जागा त्यासाठी शोधतात, तुम्हाला अनेकदा असं आढळून आलं असेल घरामध्ये जिथे-जिथे अडचण असते तिथे अनेकदा साप आढळून येतात.

पावसाच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये देखील वाढ होते. पावसांच पाणी बिळात शिरल्यामुळे साप हे बिळातून बाहेर पडतात. पावसाळ्यात शेतीची देखील कामं सुरू असतात अशा परिस्थितीमध्ये अनेकदा सापांकडे दुर्लक्ष होतं आणि आपल्याला धोका आहे असं समजून साप तुमच्यावर हल्ला करू शकतो. सरकारी आकडेवारीनुसार देशात दरवर्षी पन्नास हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू हा सर्पदंशामुळे होतो.

मात्र इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेतली पाहिजे की, भारतात सापांच्या जेवढ्या प्रजातील आढळतात त्यातील प्रत्येक जात ही विषारीच असते असं नाही. मात्र प्रत्येक साप हा विषारीच असतो हा आपला सर्वात मोठा गैरसमज आहे. त्यामुळे आपण अनेकदा दिसला साप की त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. यामुळे देशातील सापांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती नष्ट होत आहेत.

भारतामध्ये सापांच्या केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच जाती या विषारी आहेत. ज्यामध्ये नाग ज्याला आपण इंडियन कोब्रा असं देखील म्हणतो, फुरसे, मण्यार आणि घोणस या चार प्रमुख जातींचा समावेश होतो. याला बीग फोर असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला कुठे साप दिसला तर त्याला पकडण्याच किंवा मारण्याचा प्रयत्न न करता त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, सापांना पकडणं तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं. अशा काही वनस्पती आहेत, त्या तुम्ही तुमच्या घरामध्ये लावून सापांपासून बचाव करू शकता, अशाच एका वनस्पतीबद्द आज आपण माहिती घेणार आहोत.

सर्पगंधा – सर्पगंधा ही अशी वनस्पती आहे, ज्यामुळे साप तुमच्या घरात कधीच प्रवेश करणार नाही. या वनस्पतीमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असतात, तसेच तिला तीव्र असा वास असतो, ज्यामुळे साप या वनस्पतीच्या आसपास देखील फिरकत नाही.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?