Explainer : 1877 मध्ये अल निनोने 2 कोटी मृत्यू,140 वर्षानंतर आता काय होणार?, उष्णतेची लाट कुठपर्यंत जाणार ?
El Nino Impact : आजपासून १४० वर्षांपूर्वी भारतात 'अल निनो'मुळे पिके नष्ट झाला होती आणि सुमारे २ कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. मे - जून महिन्यात पुन्हा अल निनो तयार होणार आहे, त्यामुळे मोठी हानी होऊ शकते असे म्हटले जात आहे.

यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा परिणाम होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे यंदा पाऊस सरासरी पेक्षा कमी येणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, साल १८७७ मध्ये आलेल्या ‘अल निनो’ने जगात अनेक भागात झालेल्या दुष्काळाने अनेक लोक ठार झाले होते. या ‘अल निनो’ ने भारतात १८७७ मध्ये २ कोटी लोक ठार झाले होते. त्यावर्षी चीनमध्ये दुष्काळ पडून २ ते ३ कोटी लोक ठार झाले होते. ब्राझील, इजिप्त, मोरक्को, इथिओपिया आणि साऊथ आफ्रीकेतही दुष्काळाने अनेकांचे बळी गेले होते. यंदा १४० वर्षांनी येणाऱ्या ‘अल निनो’ स्थितीला सुपर ‘अल निनो’असे म्हटले जात आहे. २०२६ चा उन्हाळा हा सर्वाधिक उष्ण म्हटला जात आहे. १८७७ मध्ये भारतावर ब्रिटीशांचे राज्य होते. बॉम्बे प्रेसिडन्सी आणि मद्रास प्रेसिडन्सीमध्ये मृत्यूचे तांडव होते....
