Bihar Crime : भयंकर, सासरच्यांनी उभी पोर जाळली, बाप रडत रडत तिचा जळका पाय घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला !

ममता नेहमी वडिलांना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत सांगत असे. तसेच आपल्याला इथून घेऊन जा असे म्हणायची. पण जेव्हा वडिल तिच्याकडे पोहचले तेव्हा ममताचा मृत्यू झाला आहे. ममताची हत्या करुन मृतदेह सोन नदीजवळ गाडण्यात आला. नंतर गाडलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला आणि जाळला.

Bihar Crime : भयंकर, सासरच्यांनी उभी पोर जाळली, बाप रडत रडत तिचा जळका पाय घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला !
भयंकर, सासरच्यांनी उभी पोर जाळलीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 6:11 PM

बिहार : एका विवाहितेचा छळ करत पती आणि सासऱ्याने तिची हत्या (Murder) करुन मृतदेह जाळल्या (Burnt)ची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. जेव्हा महिलेचे वडील तेथे पोहचले तेव्हा तिचा केवळ पायच बाकी होता. महिलेच्या वडिलांनी तिचा पाय घेऊन मुफस्सिल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. ममता असे मयत मुलीचे नाव आहे. लग्न झाल्यापासून सासरचे लोक ममताचा पैशासाठी छळ करत होते. दररोज तिला मारहाण (Beating) करत होते, असे ममताचे वडिल अखिलेश बिंद यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी ममताचा पती शत्रुघ्न बिंद आणि सासरा राम प्यारे बिंद यांच्या विरोधात हुंडा आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहेरुन एक लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

ममता हिचा विवाह बरौली गावातील शत्रुघ्न बिंद याच्यासोबत मे 2021 मध्ये झाला होता. लग्नानंतर सासरचे लोक तिला माहेरुन एक लाख रुपये आणण्यास सांगत होते. मात्र माहेरचे लोक पैसे देऊ शकत नव्हते. त्यामुळे सासरचे लोक तिला रोज मारहाण करायचे. अखेर पैशासाठी सासरच्यांनी तिची सोमवारी हत्या करुन मृतदेह जाळला. घटनेची माहिती मिळताच वडिलांनी धाव घेतली. मात्र ममताचा जळून मृत्यू झाला होता. तिचा केवळ एख पायच सहीसलामत होता. वडिलांनी एका पिशवीत तो पाय टाकला आणि पोलीस ठाणे गाठले. पायातील जोडवी आणि पैंजणावरुन अखिलेश यांनी ही आपली मुलगी असल्याचा दावा केला आहे. सध्या हा पाय डीएनए रिपोर्टसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.

आधी मृतदेह गाडला मग बाहेर काढून जाळला

ममता नेहमी वडिलांना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत सांगत असे. तसेच आपल्याला इथून घेऊन जा असे म्हणायची. पण जेव्हा वडिल तिच्याकडे पोहचले तेव्हा ममताचा मृत्यू झाला आहे. ममताची हत्या करुन मृतदेह सोन नदीजवळ गाडण्यात आला. नंतर गाडलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला आणि जाळला. यामध्ये महिलेचा पाय वाचला होता, असे भोजपूरच्या एएसपींनी सांगितले. हा पाय घेऊन वडिलांनी पोलिसांकडे सुपूर्द केला. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे. (In Bihar a married woman was killed for her dowry and her body was cremated)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.