AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Independence day 2024: पेट्रोलपासून दुधापर्यंत, बटाट्यापासून सोन्यापर्यंत गेल्या 77 वर्षांत कसा बदलला भारत

Independence day 2024: एकीकडे देशाचा स्वातंत्र्यानंतर खूप विकास केला आहे, तर दुसरीकडे महागाईने देखील कळस गाठला आहे. खाद्यपदार्थांपासून ते सोने, पेट्रोल-डिझेल, सोने सर्वच महाग झाले. दैनंदिन गोष्टींमध्ये किती बदल झाला आहे ते जाणून घेऊया?

Independence day 2024: पेट्रोलपासून दुधापर्यंत, बटाट्यापासून सोन्यापर्यंत गेल्या 77 वर्षांत कसा बदलला भारत
Independence day
| Updated on: Aug 15, 2024 | 11:27 AM
Share

Independence day 2024: देशात आज 78 वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यानंतर देशात मोठ्या प्रमाणावर बदल केला झाला आहे. अनेक कठीण प्रसंगातून वाट काढत देशाने नवीन विकासाचे पल्ले गाठले आहे. अनेक नवीन कीर्तीमान बनवले आहे. मग मंगळयान किंवा चंद्रयान असो की निर्माण झालेली हरितक्रांती असो… आता 2047 पर्यंत विकसित भारत होण्याकडे वेगाने वाटचाल सुरु आहे. जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थेत भारत आला आहे.

कसा झाला अर्थव्यवस्थेचा विकास

  1. 1947 मध्ये भारताची जीडीपी 2.7 लाख कोटी होती. 2024 मध्ये देशाची जीडीपी 272.41 लाख कोटी झाली आहे.
  2. 1947 ते 1980 देशाचा विकास दर 9 ते 5 टक्के राहिला. त्यात अनेक वेळा चढ उतार आले.
  3. 1981 ते 1991 दरम्यान विकास दर शून्याच्या खाली आला. जास्तीत जास्त विकास दर 9 टक्के होता.
  4. 1992 ते 2019 विकास दर चार ते आठ टक्के राहिला. या दरम्यान देशाची अर्थव्यवस्था स्थिर राहिली आणि प्रगती झाली.
  5. आता देशाचा जीडीपी ₹295.35 लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापारात भारत

  1. 1950-51 मध्ये भारताची 1.27 अब्ज डॉलर आयात आणि 1.26 अब्ज डॉलर निर्यात होत होती.
  2. 1975-76 मध्ये 6.08 अब्ज डॉलर आयात आणि 4.66 अब्ज डॉलर निर्यात होत होती.
  3. 1990-91 मध्ये 24 अब्ज डॉलर आयात आणि 18 अब्ज डॉलर निर्यात होत होती.
  4. 2002-03 मध्ये 50 अब्ज डॉलर आयात आणि 44 अब्ज डॉलर निर्यात झाली आहे.
  5. 2023-24 मध्ये 776.68 बिलियन अमेरिकी डॉलर निर्यात आणि 854.80 बिलियन अमेरिकी डॉलर आयात होण्याचा अंदाज आहे.

महागाई अशी वाढत गेली

एकीकडे देशाचा स्वातंत्र्यानंतर खूप विकास केला आहे, तर दुसरीकडे महागाईने देखील कळस गाठला आहे. खाद्यपदार्थांपासून ते सोने, पेट्रोल-डिझेल, सोने सर्वच महाग झाले. दैनंदिन गोष्टींमध्ये किती बदल झाला आहे ते जाणून घेऊया?

वस्तू/पदार्थ 1947 मध्ये किती होता दर? आता काय आहे किंमत?
सोने (10 ग्रॅम) 88.62 रुपये (10 ग्रॅम) 72430 (10 ग्रॅम)
पेट्रोल (एक लीटर) 27 पैसे 103.44 रुपये
तांदुळ (प्रती किलो) 12 पैसे 45 रुपये
साखर (प्रती किलो) 40 पैसे 44 रुपये
बटाटे (प्रती किलो) 25 पैसे 40 रुपये
दूध (एक लीटर) 12 पैसे 60 रुपये

Follow Us
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.