AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India, China Dispute : ‘एलएसी’वर आज भारत-चीनमध्ये कमांडर स्तरावरील बैठकीची 16 वी फेरी

आज भारत आणि चीनी लष्करी अधिकाऱ्यांमधील चर्चेच्या 16 व्या फेरीला सुरुवात झाली आहे. आजच्या या बैठकीमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत (Line of Actual Control) अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

India, China Dispute : 'एलएसी'वर आज भारत-चीनमध्ये कमांडर स्तरावरील बैठकीची 16 वी फेरी
| Updated on: Jul 17, 2022 | 3:05 PM
Share

नवी दिल्ली: भारत आणि चीनमध्ये संघर्ष सुरूच आहे. अनेकदा पूर्व लडाखच्या (Eastern Ladakh) मुद्द्यावरून भारत -चीनचे सैन्य आमने-सामने (China India Border Dispute) आल्याचे पहायला मिळाले. मात्र आता हा वाद चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आणि चीनी लष्कारातील उच्चस्थरीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या 15 फेऱ्या झाल्या आहेत.या 15 फेऱ्यांमध्ये काही भागांवरील वाद मिटवण्यात यश आले आहे. मात्र अद्यापही काही भागातील वाद सुटला नसल्याने चर्चेचे सत्र सुरूच आहे. आज भारत आणि चीनी लष्करी अधिकाऱ्यांमधील चर्चेच्या 16 व्या फेरीला सुरुवात झाली आहे. आजच्या या बैठकीमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत (Line of Actual Control) उर्वरीत मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये देखील काही मुद्दे निकाली निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

11 मार्च रोजी झाली होती 15 वी फेरी

सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार ही बैठक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजुवरील चोशुल मोल्डो मीटिंग पॉईंटवर सुरू आहे. आज भारत आणि चीनी सौनिकांमध्ये सुरू असलेल्या या बैठकीमध्ये अनेक महत्त्वांच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच भारत चीनला ज्या जागांबाबत दोन्ही देशांमध्ये वाद आहे. त्या जागेवरील सैन्य माघारी घेण्यास सांगण्याची शक्यता आहे. यापूर्वी दोन्ही देशात शेवटची बैठक ही 11 मार्च रोजी झाली होती. आतापर्यंत चीन आणि भारतादरम्यान अशा चर्चेच्या एकूण 15 फेऱ्या झाल्या आहेत. या चर्चेमधून अनेक विषयांवर तोडगा काढण्यात यश मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

जयशंकर यांची चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांसोबत चर्चा

दरम्यान यापूर्वी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सात जुलै रोजी चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांच्यासोबत चर्चा केली होती. या बैठकीमध्ये पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीबाबत चर्चा करण्यता आली. तसेच जी 20 देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत देखील जयशंकर यांनी पूर्व लडाखचा मुद्दा उपस्थित करत तिथे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते.

Follow Us
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा
Chandrashekhar Bawankule | कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा; नेमका काय फायदा होणार?
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या शिफारस पत्रात नेमकं काय?
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या अंतिम चर्चेत नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं?
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा तर, आणखी नेते सोडणार पक्ष?
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी