AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India maldive row : भारत मालदीव यांच्यात तणाव कायम असतानाच आली एक महत्त्वाची बातमी

India maldive row : भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये संबंध बिघडले आहेत. याला जबाबदार आहे ते मालदीवमध्ये आलेले नवीन सरकार. मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांमध्ये कटुता वाढली आहे. पण असं असलं तरी भारताने आतापर्यंत सांमजस्याची भूमिका घेतली आहे.

India maldive row : भारत मालदीव यांच्यात तणाव कायम असतानाच आली एक महत्त्वाची बातमी
shailesh musale
shailesh musale | Updated on: Feb 23, 2024 | 9:05 PM
Share

India maldive row : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध अजूनही तणावापूर्ण आहेत. मालदीवमध्ये मुइज्जू यांचे सरकार आल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. कारण राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे चीन समर्थक मानले जातात. त्यामुळेच सरकार स्थापन झाल्यानंतर ते थेट चीनच्या दौऱ्यावर गेले. याआधी कोणतंही सरकार आले की, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष आधी भारत दौऱ्यावर येत असे. पण मुइज्जू यांनी चीनकडून अधिक मदतीची अपेक्षा आहे. चीन मात्र त्याचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने त्यांना मदत तर करत आहे. पण त्यांना कधी तो गुलाम बनवेल हे त्यांच्या अजून लक्षात आलेले नाही. कारण चीनने अशाप्रकारे इतर देशांना देखील कर्जाच्या ओझ्याखाली दाबले आहे.

मालदीवविरोधात भारतीयांमध्ये संताप

पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मालदीवच्या तीन मंत्र्यांना पदावरुन हटवण्यात आले होते. त्यानंतर भारतीय लोकांनी मालदीवविरोधात जोरदार मोहिम चालवली होती. त्यामुळेच याचा फटका मालदीवला बसला. मालदीवला जाणारे सर्वाधिक पर्यटक भारतीय होते. पण या घटनेनंतर भारतीय पर्यटकांच्या संख्या पाचव्या स्थानावर गेली आहे.

तीन देशांचा एकत्र सराव

दोन्ही देशांमध्ये तणाव कायम असताना भारतीय तटरक्षक दल, मालदीव आणि श्रीलंकेचे कर्मचारी सागरी सुरक्षा आणि आंतरकार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि हिंदी महासागर क्षेत्रातील उदयोन्मुख आव्हाने ओळखण्यासाठी चार दिवसीय त्रिपक्षीय सराव करत आहेत. भारतीय तटरक्षक जहाज, ICGS अभिनव आणि श्रीलंकन ​​नौदलाचे जहाज सरावासाठी येथे दाखल झाले. 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान तीनही देशांच्या जवानांमध्ये हा सराव चालणार आहे. तर बांगलादेश या सरावात निरीक्षक म्हणून सहभागी झाला आहे. तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर ICGS डॉर्नियर देखील या सरावात भाग घेत आहेत.

काय आहे याचा उद्देश

भारत, श्रीलंका आणि मालदीव या तीनही देशाच्या तटरक्षक दलांमध्ये सहकार्य वाढवणे, मैत्री मजबूत करणे, ऑपरेशनल क्षमता सुधारणे आणि परस्पर संबंध विकसित करणे यासाठी हा एकत्र सराव केला जात आहे. मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाने (MNDF) गुरुवारी संध्याकाळी भारतीय तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक एस. परमेश यांचे हार्दिक स्वागत केले.

दोन्ही जहाजांच्या कमांडिंग अधिकाऱ्यांनी कमांडंट MNDF CG यांची भेट घेतली आणि सहकार्य संबंधांच्या मार्गांवर चर्चा केली. ICG जहाजे अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होतील आणि श्रीलंका तटरक्षक दल आणि मालदीवचे राष्ट्रीय संरक्षण दल संयुक्त सागरी सरावात सहभागी होणार आहेत.

Follow Us
सर्वात मोठी अपडेट! खारातच्या जमिनीत पार्टनरशिप... चाकणकरांचा पलटवार
सर्वात मोठी अपडेट! खारातच्या जमिनीत पार्टनरशिप... चाकणकरांचा पलटवार, सगळ्यांना कोर्टात ओढलं
महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
Pune Mahapalika | महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
गाडी, कॅबिनसह तुला... मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; थेट
गाडी, कॅबिनसह तुला... मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; त्या ई-मेलमागील सत्य प्रथमच समोर
पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता
Beed | पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता तर...
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान NCP नेत्याचं मोठं विधान
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?