AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालदीवची पोल उघडली, भारतीय सैनिक परततात अडचणी सुरु, देशात विमानांसाठी पायलटच नाही

India Maldives Tension:चीन समर्थक म्हणून विद्यामान राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू ओळखले जातात. त्यांनी मालदीवमधील तीन विमानासाठी असणाऱ्या भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना 10 मे पर्यंत परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावाखाली आले. भारताने यापूर्वीच ७६ लष्करी जवानांना परत बोलावले आहे.

मालदीवची पोल उघडली, भारतीय सैनिक परततात अडचणी सुरु, देशात विमानांसाठी पायलटच नाही
| Updated on: May 13, 2024 | 5:09 PM
Share

India Maldives Tension: मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी भारताशी पंगा घेतला. मालदीवमध्ये असणाऱ्या 76 भारतीय सैनिकांना परत जाण्याचे सांगितले. भारतीय सैनिक मालदीवमधून परत येताच त्यांची पोल उघडली आहे. मालदीव अडचणीत आल्याचे संरक्षणमंत्र्यांनी मान्य केले आहे. मालदीवचे संरक्षणमंत्री घासन मौमून यांनी भारताकडून मिळालेले तीन विमानांचे उड्डाण करण्यासाठी सक्षम पायलट नसल्याचे म्हटले आहे. मालदीवच्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

मालदीवकडून सरळ कबुली

घसान यांनी राष्ट्रपती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सरळ सरळ कबुली देऊन टाकली. त्यांनी सांगितले की, मालदीवमध्ये दोन हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान चालवण्यासाठी भारतीय सैनिक होते. परंतु भारतीय सैनिकांना परत पाठवण्यात आले. त्यांच्या जागी भारतातील असैनिक आले. परंतु मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल (MNDF) कडे भारतीय लष्कराने दिलेली तीन विमाने चालवू शकतील असा एकही कर्मचारी नाही. मात्र, काही सैनिकांना आधीच्या सरकारांशी झालेल्या करारांतर्गत उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात आले.

विमाने चालवण्याचे प्रशिक्षणात विविध टप्पे पार करावे लागतात, परंतु आमच्या सैनिकांना विविध कारणांमुळे ते पूर्ण करता आले नाही. त्यामुळे, सध्या आपल्या सशस्त्र दलात अशी कोणतीही व्यक्ती नाही जिच्याकडे दोन हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर उडवण्याचा परवाना किंवा कसून उड्डाणाचे प्रशिक्षण आहे, असे घासन यांनी सांगितले.

का उचलले मालदीवने हे पाऊल

चीन समर्थक म्हणून विद्यामान राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू ओळखले जातात. त्यांनी मालदीवमधील तीन विमानासाठी असणाऱ्या भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना 10 मे पर्यंत परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावाखाली आले. भारताने यापूर्वीच ७६ लष्करी जवानांना परत बोलावले आहे. मात्र, मालदीव सरकारचा त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या डॉक्टरांना हटवण्याचा कोणताही विचार नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्या चार महिन्यांत भारतातून मालदीवमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 42 टक्क्यांनी घट झाली आहे. भारतीय पर्यटकांनी टाकलेल्या बहिष्काराचा परिणाम मालदीववर झाला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.