AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताची ग्लोबर पॉवर, चीनला जोरदार झटका, चाबहारनंतर आणखी एक विदेशी बंदराची कमान भारताकडे

India China: ईराणमधील चाबहार बंदरानंतर दुसऱ्या विदेशी बंदराचे अधिग्रहण भारताने केले आहे. चाबहारमध्ये भारताला मर्यादीत अधिकार मिळाला आहे. परंतु सिटवे बंदरावर भारतास पूर्ण अधिकार मिळाले आहे. IGPL कडे सध्या इराणमधील चाबहार बंदरातील कंटेनर टर्मिनलच्या संचालनाचे काम आहे.

भारताची ग्लोबर पॉवर, चीनला जोरदार झटका, चाबहारनंतर आणखी एक विदेशी बंदराची कमान भारताकडे
india-china
| Updated on: Apr 11, 2024 | 12:39 PM
Share

भारताचे महत्व जागतिक पातळीवर वाढत आहे. भारताच्या वाढत्या ग्लोबर पॉवरमुळे चीन अस्वस्थ झाला आहे. भारताविरोधात कारवाया करण्याचे त्याचे धोरण कायम आहे. भारताकडून चीनला धक्के दिले जात आहे. इराणच्या चाबहार बंदरानंतर भारताकडे आणखी एक विदेशी बंदर आले आहे. भारताला आता म्यानमारमधील सित्तवे बंदराची कमान मिळाली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमधील सिटवे येथील बंदराचे काम ताब्यात घेण्यास परवानगी दिली आहे. इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड (IGPL) कडे या बंदराची कमान असणार आहे. कलादान नदीवर असलेल्या सिटवे बंदराचे संपूर्ण कामकाज आयजीपीएल पाहणार आहे. इंडिया पोर्ट्स ग्लोबल ही जहाज व जलमार्ग मंत्रालयाच्या मालकीची कंपनी आहे. सिटवे बंदराची मिळालेली कमान म्हणजे भारताच्या आंतरराष्ट्रीय कूटनीतीचा विजय आहे.

दुसऱ्या विदेशी बंदराचे अधिग्रहण

ईराणमधील चाबहार बंदरानंतर दुसऱ्या विदेशी बंदराचे अधिग्रहण भारताने केले आहे. चाबहारमध्ये भारताला मर्यादीत अधिकार मिळाला आहे. परंतु सिटवे बंदरावर भारतास पूर्ण अधिकार मिळाले आहे. IGPL कडे सध्या इराणमधील चाबहार बंदरातील कंटेनर टर्मिनलच्या संचालनाचे काम आहे. सिटवे बंदरामुळे समुद्रात भारताची उपस्थिती मजबूत झाली आहे. तसेच क्षेत्रीय संपर्क वाढवण्याच्या दिशेने हे एक धोरणात्मक पाऊल मानले जात आहे.

का आहे सिटवे पोर्टचे महत्व

सिटवे बंदर कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचा एक भाग आहे. कोलकाता बंदर म्यानमारच्या सिटवे बंदराशी समुद्रमार्गे जोडण्याचा हा प्रकल्प आहे. सित्तवे बंदर म्यानमारमधील पलेटवा ते कलादान नदीच्या जलमार्गाने आणि नंतर मिझोरममधील जोरिनपुईला रस्त्याने जोडले जाणार आहे. या बंदरामुळे दोन्ही देशांचा आर्थिक विकास वेगाने होणार आहे. भारताला या बंदराचे संचलन मिळाले असल्यामुळे हिंद महासागरावर वर्चस्वाचे चीनचे स्वप्न भंगले आहे.

चीनचे टेन्शन वाढणार

मिझोरमपर्यंत जोडल्या जाणाऱ्या या मार्गामुळे भारताला उत्तर पूर्व राज्यात पोहचणे सोपे होणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ पूर्वत्तर राज्यांमध्ये माल पाठवण्यासाठी नवीन मार्ग मिळणार नाही तर कोलकाता आणि मिझोरमधील अंतर कमी होणार आहे. यामुळे भारताचे भुतान आणि बांगलादेशमध्ये असणाऱ्या सिलीगुडी कॅरिडोरवरील अवलंबत्व कमी होणार आहे.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.