AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railway | एकदम अनोखी ट्रेन! नाव तेच, नंबरही तोच, मार्गही तोच, पण धावते तीन ठिकाणांहून

Indian Railway | भारतीय रेल्वे, एक अशी ट्रेन चालवते, जिचा नंबर एक आहे, तिचे नाव पण एक आहे. तिचा मार्ग पण एकच आहे. पण एकाच वेळी ही रेल्वे तीन वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवरुन धावते, त्यामुळे या रेल्वेतून प्रवास करणारा चक्रावून जातो. या रेल्वेला प्रवाशी जादूई ट्रेन म्हणतात.

Indian Railway | एकदम अनोखी ट्रेन! नाव तेच, नंबरही तोच, मार्गही तोच, पण धावते तीन ठिकाणांहून
| Updated on: Feb 23, 2024 | 12:05 PM
Share

नवी दिल्ली | 23 February 2024 : देशात एक अशी रेल्वे चालविण्यात येते, जिचा नंबर एक आहे, नाव एक आहे आणि मार्ग पण एकच आहे. पण तरीही ती एकाच वेळी तीन वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवरुन धावते. त्यामुळे या रेल्वेने प्रवास करणारे प्रवाशी चक्रावतात. अनेक प्रवाशी यामधून प्रवास करतात, ते हिला जादूई ट्रेन म्हणतात. तुम्हाला पण आश्चर्य वाटत असेल की एकच ट्रेन एकाच वेळी तीन ठिकाणाहून कशी बरं धावत असेल? नाही का? चला तर जाणून घ्या या खास रेल्वेची कहाणी..

गंतव्य स्थानावर पोहचण्यासाठी लागतो वेळ

कमी पल्ल्याच्या रेल्वेला त्यांच्या गंतव्य स्थानी, अखेरच्या स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी कालावधी लागतो. ती एका वेळी एका स्टेशनवर असते. पण या रेल्वेला तिच्या अखेरच्या स्थानापर्यंत पोहचण्यासाठी 24 तासांपेक्षा अधिकचा कालावधी लागतो. ही ट्रेन एकावेळी दोन स्थानकांवर असते. तर तिला अखेरच्या स्थानकावर पोहचण्यासाठी 48 तासांपेक्षा अधिकचा कालावधी लागतो. अनेकदा ही रेल्वे तीन स्थानकांवर पण असू शकते. एकाचवेळी तीन स्टेशनवर रोज जाणारी ट्रेन असू शकते.

देशातील लांब पल्ल्याची रेल्वे

देशातील सर्वात लांब पल्ल्याच्या रेल्वेचा क्रमांक 15909/15910 असा आहे. या रेल्वेचे नाव अवध-आसाम असे आहे. ही ट्रेन आसाममधील दिब्रुगड ते राजस्थानातील लालगडपर्यंत धावते. या दरम्यान ही रेल्वे 3100 किमीपेक्षा अधिकचा पल्ला गाठते. ही रेल्वे तिच्या प्रवासात एकूण 88 स्थानकांवर थांबते. या स्थानकांवर ही रेल्वे दोन ते पाच मिनिटे थांबते. एकूण स्टेशनचा आणि थांबण्याचा विचार करता या रेल्वेचे एकूण चार तास स्टेशनवर थांबण्यात जातात.

एक, दोन नाही तर सात ट्रेन सेटची गरज

अवध-आसाम या रोज धावणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनसाठी सात ट्रेन सेटची गरज पडते. स्टेशनवरुन सुटल्यानंतर चौथ्या दिवशी ही रेल्वे तिच्या निर्धारीत स्टेशनवर, गंतव्य स्थानावर पोहचते. या कारणामुळे दोन्ही बाजूने तीन-तीन ट्रेन चालविण्यात येते आणि एक ट्रेन सेट अतिरिक्त असतो.

ट्रेन अशी करते ‘जादू’

15909 नंबरची ट्रेन सकाळी दिब्रुगडहून 10.20 वाजता सुटते. त्याचदरम्यान दुसरी ट्रेन 10.45 वाजता बिहार येथील कटियार जंक्शनहून निघते. हे स्थानक दिब्रुगडहून 1166 किमी इतके दूर आहे. एक ट्रेन दिब्रुगडवरुन एक दिवसाअगोदरच निघते. तर त्याचवेळी तिसरी ट्रेन 2247 किमी दूर सकाळी 10.38 वाजता उत्तर प्रदेशातील बरेली स्टेशनवर असते. ही रेल्वे दोन दिवसांपूर्वी दिब्रुगडवरुन निघालेली असते. त्यामुळे भविष्यात तुम्ही या रेल्वेने प्रवास करत असाल तर चक्रावून जाऊ नका.

Follow Us
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ.
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा.
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान..
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून....
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं.
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच.
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण.
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन.
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत.
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या.