AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना तिकीट दरवाढ, ना मालभाड्यात वाढ, पण रेल्वे मालामाल, भारतीय रेल्वेने शोधला हा अनोखा पर्याय

रेल्वे मंत्रालयाने सन 2024-25 मध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत 36.25 लाख यूनिट सौर ऊर्जाचे उत्पादन केले. त्यामुळे 1.37 कोटी रुपयांची बचत झाली आहे. रेल्वेचा हा निर्णय उत्पन्न वाढवण्यासाठी फायदेशीर ठरला आहे. या निर्णयामुळे वेगवेगळ्या ठिकाणी डिझेलचा वापर कमी झाला.

ना तिकीट दरवाढ, ना मालभाड्यात वाढ, पण रेल्वे मालामाल, भारतीय रेल्वेने शोधला हा अनोखा पर्याय
Railway
| Updated on: Dec 17, 2024 | 8:20 PM
Share

भारतीय रेल्वेने गेल्या अनेक वर्षांपासून तिकीट दरात वाढ केली नाही. मालभाडे वाढवले नाही. त्यानंतर रेल्वेने उत्पन्न वाढवले आहे. त्या उत्पनामुळे रेल्वे मालामाल झाली आहे. प्रवाशांकडून काही न घेता रेल्वे मालामाल कशी होत आहे? या प्रश्नाचे उत्तर सौर उर्जा आहे. रेल्वेने विविध ठिकाणी सौर पॅनल लावून विजेची आणि डिझेलची बचत केली आहे. सौर उर्जा पॅनल लावण्याचा निर्णय रेल्वे आता सर्व विभागात लागू करणार आहे.

पर्यावरणासाठी फायदेशीर निर्णय

रेल्वे मंत्रालयाने सन 2024-25 मध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत 36.25 लाख यूनिट सौर ऊर्जाचे उत्पादन केले. त्यामुळे 1.37 कोटी रुपयांची बचत झाली आहे. रेल्वेचा हा निर्णय उत्पन्न वाढवण्यासाठी फायदेशीर ठरला आहे. या निर्णयामुळे वेगवेगळ्या ठिकाणी डिझेलचा वापर कमी झाला. तसेच कार्बन उत्सर्जन कमी होत आहे. पर्यावरण संरक्षण आणि ग्लोबल वार्मिंग रोखण्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरला आहे.

या रेल्वे स्थानकात सौर पॅनल

लालकुआन आणि रामनगर स्थानकांवर 50 KWp, टनकपूर येथे 30 KWp, कासगंज आणि बदायूं स्थानकांवर 20 KWp, फारुखाबाद आणि कन्नौज येथे 15 KWp, गंजदुंडवारा, रावतपूर, मथुरा कँट, पिलीभीत, फतेहगढ, रुद्रपूर सिटी, हल्दवानी, काठगोदाम आणि खातिमा स्थानकांवर 10 केडब्ल्यूपीसह 16 स्थानकांवर 285 किलो वॅट क्षमतेचे रूफ टॉप सोलर पॅनेल लावले गेले आहेत.

अशी आहे भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वेने रोज 2 कोटी 40 लाख लोक प्रवास करतात. भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठे चौथे नेटवर्क आहेत. देशात रोज जवळपास 22,593 ट्रेन धावतात. त्यात 13,452 प्रवासी ट्रेन आहेत. या रेल्वे जवळपास 7,325 स्टेशन कव्हर करतात. रेल्वेच्या या संख्येत मेल, एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेनचा समावेश आहे. तसेच रेल्वेच्या 9141 मालगाड्याही रोज धावतात. त्या माध्यमातून देशाच्या सर्व भागात सामान पोहचवले जाते. रेल्वेकडून रोज 20.38 कोटी मालाची वाहतूक होते. तसेच मालगाडी आणि प्रवाशी रेल्वे मिळून रोज 67,368 किलोमीटर अंतर कापले जाते.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.