AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना तिकीट दरवाढ, ना मालभाड्यात वाढ, पण रेल्वे मालामाल, भारतीय रेल्वेने शोधला हा अनोखा पर्याय

रेल्वे मंत्रालयाने सन 2024-25 मध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत 36.25 लाख यूनिट सौर ऊर्जाचे उत्पादन केले. त्यामुळे 1.37 कोटी रुपयांची बचत झाली आहे. रेल्वेचा हा निर्णय उत्पन्न वाढवण्यासाठी फायदेशीर ठरला आहे. या निर्णयामुळे वेगवेगळ्या ठिकाणी डिझेलचा वापर कमी झाला.

ना तिकीट दरवाढ, ना मालभाड्यात वाढ, पण रेल्वे मालामाल, भारतीय रेल्वेने शोधला हा अनोखा पर्याय
Railway
| Updated on: Dec 17, 2024 | 8:20 PM
Share

भारतीय रेल्वेने गेल्या अनेक वर्षांपासून तिकीट दरात वाढ केली नाही. मालभाडे वाढवले नाही. त्यानंतर रेल्वेने उत्पन्न वाढवले आहे. त्या उत्पनामुळे रेल्वे मालामाल झाली आहे. प्रवाशांकडून काही न घेता रेल्वे मालामाल कशी होत आहे? या प्रश्नाचे उत्तर सौर उर्जा आहे. रेल्वेने विविध ठिकाणी सौर पॅनल लावून विजेची आणि डिझेलची बचत केली आहे. सौर उर्जा पॅनल लावण्याचा निर्णय रेल्वे आता सर्व विभागात लागू करणार आहे.

पर्यावरणासाठी फायदेशीर निर्णय

रेल्वे मंत्रालयाने सन 2024-25 मध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत 36.25 लाख यूनिट सौर ऊर्जाचे उत्पादन केले. त्यामुळे 1.37 कोटी रुपयांची बचत झाली आहे. रेल्वेचा हा निर्णय उत्पन्न वाढवण्यासाठी फायदेशीर ठरला आहे. या निर्णयामुळे वेगवेगळ्या ठिकाणी डिझेलचा वापर कमी झाला. तसेच कार्बन उत्सर्जन कमी होत आहे. पर्यावरण संरक्षण आणि ग्लोबल वार्मिंग रोखण्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरला आहे.

या रेल्वे स्थानकात सौर पॅनल

लालकुआन आणि रामनगर स्थानकांवर 50 KWp, टनकपूर येथे 30 KWp, कासगंज आणि बदायूं स्थानकांवर 20 KWp, फारुखाबाद आणि कन्नौज येथे 15 KWp, गंजदुंडवारा, रावतपूर, मथुरा कँट, पिलीभीत, फतेहगढ, रुद्रपूर सिटी, हल्दवानी, काठगोदाम आणि खातिमा स्थानकांवर 10 केडब्ल्यूपीसह 16 स्थानकांवर 285 किलो वॅट क्षमतेचे रूफ टॉप सोलर पॅनेल लावले गेले आहेत.

अशी आहे भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वेने रोज 2 कोटी 40 लाख लोक प्रवास करतात. भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठे चौथे नेटवर्क आहेत. देशात रोज जवळपास 22,593 ट्रेन धावतात. त्यात 13,452 प्रवासी ट्रेन आहेत. या रेल्वे जवळपास 7,325 स्टेशन कव्हर करतात. रेल्वेच्या या संख्येत मेल, एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेनचा समावेश आहे. तसेच रेल्वेच्या 9141 मालगाड्याही रोज धावतात. त्या माध्यमातून देशाच्या सर्व भागात सामान पोहचवले जाते. रेल्वेकडून रोज 20.38 कोटी मालाची वाहतूक होते. तसेच मालगाडी आणि प्रवाशी रेल्वे मिळून रोज 67,368 किलोमीटर अंतर कापले जाते.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.