AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी भारतीय जवानांनी सुरु केले ऑपरेशन सर्वशक्ती

काश्मीरमध्ये काही भागात पुन्हा एकदा दहशतवादाला खतपाणी घातलं जात असून पाकिस्तानातून कारवाया सुरु झाल्या आहेत. याच दहशतवादी कारवाया मोडून काढण्यासाठी भारतीय जवानांनी आता ऑपरेशन सर्वशक्ती सुरु केले आहे. यामध्ये सर्व सुरक्षा संस्था एकत्र येऊन दहशतवाद्यांचा खात्मा करणार आहेत.

दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी भारतीय जवानांनी सुरु केले ऑपरेशन सर्वशक्ती
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jan 13, 2024 | 8:20 PM
Share

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया होत असल्याने भारतीय लष्कराने आता मोठे पाऊल उचलले आहे. पाकिस्तानातून होत असलेल्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सर्वशक्ती सुरु केले आहे. या अंतर्गत पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाणार आहे. ऑपरेशन सर्वशक्ती दरम्यान  पर्वतरांगांच्या बाजूंने होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सुरु केले गेले आहे.

सर्व एकत्र येऊन करणार कारवाई

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मू आणि काश्मीर पोलीस, सीआरपीएफ, विशेष ऑपरेशन ग्रुप आणि गुप्तचर संस्था काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी एकत्र काम करतील.

दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी ही कारवाई अपेक्षित आहे. दहशतवादी कारवाया नष्ट करण्यासाठी 2003 पासून ऑपरेशन सर्पविनाश सुरू करण्यात आले होते. या काळात या भागातील दहशतवादी कारवाया जवळपास संपुष्टात आल्या होत्या.

आणखी लष्कर पाठवले जाणार

भारतीय लष्कराने राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये आणखी सैन्य दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या भागातील गुप्तचर यंत्रणा मजबूत करण्यासोबतच सैनिकांनाही सहभागी करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पाकिस्तानातून पीर पंजाल पर्वतरांगांच्या दक्षिणेकडील राजौरी पुंछ सेक्टरमध्ये दहशतवादाला पुन्हा एकदा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. शुक्रवारी कृष्णा घाटी परिसरात लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता, मात्र नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून जवानांनी प्रत्युत्तर दिले नाही. गेल्या वर्षीही २१ डिसेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते.

कारवाया संपवण्यासाठी पाऊले

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी अलीकडेच सांगितले होते की. या भागातून होणाऱ्या दहशतवादी कारवाया जवळपास संपल्या होत्या. पण पुन्हा एकदा येथून दहशतवाद्यांना अॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्कर, गुप्तचर संस्थांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर लगेचच यावर नियोजन केले गेले आणि काम सुरु झाले. भारतीय लष्कराकडून राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये आणखी सैन्य पाठवले जात आहे.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.