AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Maldives row | भारताला नडणाऱ्या मालदीवला सणसणीत चपराक, पर्यटक संख्येत बसला इतका मोठा फटका

India-Maldives row | भारताशी पंगा घेणाऱ्या मालदीवला आता आर्थिक फटके बसण्यास सुरुवात झाली आहे. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्यामुळे हे सर्व घडतय. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने आकडे जारी केले आहेत. त्यावरुन चित्र स्पष्ट झालय.

India-Maldives row | भारताला नडणाऱ्या मालदीवला सणसणीत चपराक, पर्यटक संख्येत बसला इतका मोठा फटका
india vs maldives
| Updated on: Mar 09, 2024 | 8:46 AM
Share

India-maldives row | भारतासोबतचा वाद मालदीवला चांगलाच महाग पडला आहे. मालदीवच कंबरड मोडलं आहे. मालदीव पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. भारतीय पर्यटकांची संख्या घटल्याने मालदीवला चांगलाच फटका बसला आहे. या सगळ्या वादाचा मालदीवच्या पर्यटन उद्योगावर परिणाम झालाय. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने आकडे जारी केले आहेत. भारतासोबतच्या राजनैतिक वादामुळे मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या 33 टक्क्याने घटली आहे. मार्च 2023 आणि मार्च 2024 मध्ये मालदीवला गेलेल्या पर्यटकांच्या आकड्यांच्या विश्लेषणातून ही बाब स्पष्ट झालीय.

मागच्यावर्षी मार्च महिन्यात मालदीवला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये भारत दुसऱ्या स्थानी होता. पण आता भारत सहाव्या स्थानावर आहे. या वर्षी मार्च महिन्यात जवळपास 27 हजार पर्यटक मालदीवला गेले. मीडिया रिपोर्टनुसार, मार्च 2024 मध्ये 27,224 पर्यटक मालदीवला गेले. हेच मार्च 2023 मध्ये मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या 41 हजारपेक्षा जास्त होती. म्हणजेच यंदाच्या वर्षी भारतीय पर्यटकांची संख्या 33 टक्क्याने घटली आहे.

किती हजार चिनी मालदीवला गेले?

अलीकडे लक्षद्वीपला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. हेच मालदीवच्या पर्यटक संख्येमध्ये घट होण्यामागच कारण आहे. मालदीवला जाणाऱ्या चिनी पर्यटकांची संख्या वाढली आहे. यावर्षी मार्च महिन्यात जवळपास 54 हजार चिनी नागरिकांनी मालदीवला भेट दिलीय.

मालदीवने भारतासोबत कुठल्या कराराच नूतनीकरण नाही केलं?

हायड्रोग्राफिक सर्वेक्षणासाठी भारतासोबतच्या कराराच नूतनीकरण न करण्याचा निर्णय मालदीवने घेतला आहे. राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू भारतविरोधी असून त्यांचा चीनकडे कल जास्त आहे. मोफत सैन्य मदत मिळवण्यासाठी मालदीवने चीनसोबत एका संरक्षण करार केला आहे. मागच्यावर्षी मुइज्जू मालदीवचे राष्ट्रपती झाले, त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध बिघडत गेले. भारताने आपलं सर्व सैन्य माघारी बोलवून घ्याव, ही त्यांची प्रमुख मागणी होती. हिंद महासागर क्षेत्रात रणनितीक दृष्टीने मालदीव भारतासाठी महत्त्वाचा देश आहे.

Follow Us
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी.
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय.
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट...
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट....
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल.