AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrayaan-3 | भारताच्या मिशन लॉन्चला एक दिवस उरलेला असताना चीनकडून चांद्र मोहिमेसंदर्भात मोठी घोषणा

Chandrayaan-3 | चीनने या घोषणेमधून आपण सुपर पॉवर असल्याच दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. नेमकी ही घोषणा काय? आता पुन्हा चंद्र मोहिमा इतक्या का वाढल्या ? त्यामागे काय कारण आहे?

Chandrayaan-3 | भारताच्या मिशन लॉन्चला एक दिवस उरलेला असताना चीनकडून चांद्र मोहिमेसंदर्भात मोठी घोषणा
Nasa Moon MissionImage Credit source: Nasa
| Updated on: Jul 13, 2023 | 1:32 PM
Share

नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेला आता फक्त एक दिवस उरला आहे. भारतीय अवकाश संसोधन संस्था इस्रो चांद्रयान-3 च्या लॉन्चिंगसाठी सज्ज आहे. समस्त भारतीयांचे डोळे या महत्वकांक्षी मोहिमेकडे लागले आहेत. चंद्रावर लँडरच यशस्वी लँडिंग आणि रोव्हरच्या माध्यमातून संशोधन ही इस्रो समोरची दोन मुख्य लक्ष्य आहेत. भारतीय चांद्रयान-3 मिशन लॉन्चिंगच्या प्रतिक्षेत असताना शेजारच्या चीनने मोठी घोषणा केली आहे.

इतर क्षेत्रांप्रमाणे भारत आणि चीनमध्ये अवकाश संशोधन क्षेत्रातही स्पर्धा आहे. भारताची मिशन डेट जवळ आलेली असताना, आता चीनने त्यांच्या चांद्र मोहिमेची घोषणा केली आहे.

चीनच मिशन काय आहे?

चीनने त्यांच्या मानवी चंद्र मोहिमेची घोषणा केली आहे. 2030 मध्ये मानवाला चंद्रावर पाठवण्याची चीनची योजना आहे. चीन या मिशन अंतर्गत दोन रॉकेट्स चंद्राच्या कक्षेत पाठवणार आहे. सध्या जगामध्ये अमेरिका एकमेव देश आहे, ज्यांनी अपोलो मिशन अंतर्गत 1968 ते 1972 दरम्यान मानवी चंद्र मोहिमा केल्या आहेत. अमेरिके व्यतिरिक्त कुठल्याही देशाने चंद्रावर माणूस पाठवलेला नाही.

आता पुन्हा चंद्र मोहिमा इतक्या का वाढल्या ?

मानवी अवकाश मोहिम प्रत्यक्षात आण्यासाठी चीनला अजून शक्तीशाली रॉकेट विकसित करण्यात तंत्रज्ञान अवगत झालेलं नाही. चीनच्या मानवी मोहिमेत, वैज्ञानिक उद्दिष्टय पूर्ण केल्यानंतर लँडर पुन्हा अवकाशवीरांना घेऊन चंद्रावर येईल. चंद्रावर माणूस पाठवण्याच्या मोहिमांना पुन्हा एकदा गती आली आहे. चंद्रावरील खनिजांचा शोध घेणं, हे अमेरिका आणि चीनच मुख्य लक्ष्य आहे. चंद्रावर मानवी वस्ती स्थापित करणं शक्य आहे का? हा सुद्धा उद्देश आहे. सध्या मंगळ ग्रहावर त्याच दृष्टीने संशोधन सुरु आहे. भारताची चांद्रयान-2 मोहिम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली होती. मिशन पूर्ण व्हायला शेवटची काही मिनिट बाकी असताना इस्रोचा लँडरशी संर्पक तुटला होता.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...