AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Life Expectancy : भारतीयांच्या आयुर्मानात 2 वर्षांनी वाढ! नेमकं आता किती आहे भारतीयांचं सरासरी वय? जाणून घ्या

गेल्या 45 वर्षात भारतीयांचं आर्युमान 20 वर्षांनी वाढलं असल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय.

Life Expectancy : भारतीयांच्या आयुर्मानात 2 वर्षांनी वाढ! नेमकं आता किती आहे भारतीयांचं सरासरी वय? जाणून घ्या
नेमकं किती आहे आता वय?Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 13, 2022 | 7:44 AM
Share

भारतीयांचं आर्युमान (Life Expectancy in India) दोन वर्षांने वाढलंय. भारतीयांचं सरासरी वय हे 69.7 वर्ष असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. 2015 ते 2019 च्या काळात भारतीयांच्या वयात वाढ झाली असल्याचा अहवाल समोर आलाय. भारतीयांच्या आर्युमानात (Life) दोन वर्षांची वाढ होण्यासाठी जवळपास दहा वर्ष लागली आहेत. पाच वर्षांखालील मुलांचे मृत्यू आणि जन्मावेळी होणारे मृत्यू, ही आर्युमान अत्यंत संथ गतीने वाढण्यामागील मुलभूत कारणं असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या दोन प्रश्नांवर काम केलं गेल्यास भारतीयांचं आयुष्य आणखी वेगानं वाढू शकतं, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय. भारतीयांचं आर्युमान वाढलं असलं, तरी ते सरासरी जागजित आर्युमानापेक्षा कमीच असल्याचंही दिसून आलंय. जगाचं (World life Expectancy) सरासरी आर्युमान 72.6 इतकं आहे, तर भारतीयांचं सरासरी आर्युमान 69.7 इतकं नोंदवलं गेलंय.

जन्मवेळी अर्भकाचा मृत्यू होणं, किंवा पाच वर्ष वयाच्या आत मृत्यू होण्याचं प्रमाण मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक आहे. गेल्या 45 वर्षात भारतीयांचं आर्युमान 20 वर्षांनी वाढलं असल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय. 1970-75 मध्ये जन्मावेळी असलेलं सरासरी आर्युमान हे 49.7 वर्ष इतकं होतं. ते आता 69.7 वर्ष इतकं झालंय. ‘एसआरएस एब्रिज्ड लाईफ टेबल्स 2015-2019’च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलंय.

पाहा सविस्तर आकडेवारी :

 पुरुषमहिलाएकूण
दिल्ली74.377.575.9
केरळ72.37875.2
जम्मू काश्मीर72.676.174.2
हिमाचल प्रदेश69.977.173.1
पंजाब71.174.772.8
महाराष्ट्र71.67472.7
तमिळनाडू70.674.972.6
प. बंगाल7173.272.1
उत्तराखंड67.673.970.6
आंध्र प्रदेश68.971.870.3
गुजरात67.972.870.2
हरियाणा67.772.669.9
ओडिशा68.571.169.8
कर्नाटक67.971.369.5
झारखंड70.268.869.4
बिहार69.668.869.2
राजस्थान66.871.369
आसाम66.868.367.5
मध्य प्रदेश65.269.167
उत्तर प्रदेश6566.265.6
छत्तीसगड63.766.965.3
भारत68.471.169.7

ग्रामीण आणि शहरी भागात तफावत

भारतातील बहुतांश राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात प्रचंड तफावत असून त्याचाही परिणाम आर्युमानाच्या आकडेवारीवर पाहायला मिळाला आहे. आसाममध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील आर्युमान हे आठ वर्षांचं आहे. तर उत्तराखंडमध्ये आर्युमान कमी झाल्याचंही दिसून आल्यानं चिंताही व्यक्त केली जातेय. 2010 ते 2014 मध्ये उत्तराखंडमध्ये आयुर्मान 71.4 इतकं होतं. ते 2015-19 मध्ये घटलं असून आता ते 70.6 वर आलंय.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.