AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Life Expectancy : भारतीयांच्या आयुर्मानात 2 वर्षांनी वाढ! नेमकं आता किती आहे भारतीयांचं सरासरी वय? जाणून घ्या

गेल्या 45 वर्षात भारतीयांचं आर्युमान 20 वर्षांनी वाढलं असल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय.

Life Expectancy : भारतीयांच्या आयुर्मानात 2 वर्षांनी वाढ! नेमकं आता किती आहे भारतीयांचं सरासरी वय? जाणून घ्या
नेमकं किती आहे आता वय?Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jun 13, 2022 | 7:44 AM
Share

भारतीयांचं आर्युमान (Life Expectancy in India) दोन वर्षांने वाढलंय. भारतीयांचं सरासरी वय हे 69.7 वर्ष असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. 2015 ते 2019 च्या काळात भारतीयांच्या वयात वाढ झाली असल्याचा अहवाल समोर आलाय. भारतीयांच्या आर्युमानात (Life) दोन वर्षांची वाढ होण्यासाठी जवळपास दहा वर्ष लागली आहेत. पाच वर्षांखालील मुलांचे मृत्यू आणि जन्मावेळी होणारे मृत्यू, ही आर्युमान अत्यंत संथ गतीने वाढण्यामागील मुलभूत कारणं असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या दोन प्रश्नांवर काम केलं गेल्यास भारतीयांचं आयुष्य आणखी वेगानं वाढू शकतं, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय. भारतीयांचं आर्युमान वाढलं असलं, तरी ते सरासरी जागजित आर्युमानापेक्षा कमीच असल्याचंही दिसून आलंय. जगाचं (World life Expectancy) सरासरी आर्युमान 72.6 इतकं आहे, तर भारतीयांचं सरासरी आर्युमान 69.7 इतकं नोंदवलं गेलंय.

जन्मवेळी अर्भकाचा मृत्यू होणं, किंवा पाच वर्ष वयाच्या आत मृत्यू होण्याचं प्रमाण मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक आहे. गेल्या 45 वर्षात भारतीयांचं आर्युमान 20 वर्षांनी वाढलं असल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय. 1970-75 मध्ये जन्मावेळी असलेलं सरासरी आर्युमान हे 49.7 वर्ष इतकं होतं. ते आता 69.7 वर्ष इतकं झालंय. ‘एसआरएस एब्रिज्ड लाईफ टेबल्स 2015-2019’च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलंय.

पाहा सविस्तर आकडेवारी :

 पुरुषमहिलाएकूण
दिल्ली74.377.575.9
केरळ72.37875.2
जम्मू काश्मीर72.676.174.2
हिमाचल प्रदेश69.977.173.1
पंजाब71.174.772.8
महाराष्ट्र71.67472.7
तमिळनाडू70.674.972.6
प. बंगाल7173.272.1
उत्तराखंड67.673.970.6
आंध्र प्रदेश68.971.870.3
गुजरात67.972.870.2
हरियाणा67.772.669.9
ओडिशा68.571.169.8
कर्नाटक67.971.369.5
झारखंड70.268.869.4
बिहार69.668.869.2
राजस्थान66.871.369
आसाम66.868.367.5
मध्य प्रदेश65.269.167
उत्तर प्रदेश6566.265.6
छत्तीसगड63.766.965.3
भारत68.471.169.7

ग्रामीण आणि शहरी भागात तफावत

भारतातील बहुतांश राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात प्रचंड तफावत असून त्याचाही परिणाम आर्युमानाच्या आकडेवारीवर पाहायला मिळाला आहे. आसाममध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील आर्युमान हे आठ वर्षांचं आहे. तर उत्तराखंडमध्ये आर्युमान कमी झाल्याचंही दिसून आल्यानं चिंताही व्यक्त केली जातेय. 2010 ते 2014 मध्ये उत्तराखंडमध्ये आयुर्मान 71.4 इतकं होतं. ते 2015-19 मध्ये घटलं असून आता ते 70.6 वर आलंय.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक