AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : टीम इंडियाची ही जोडी म्हणजे विजय फिक्स! कोण आहेत ते दोघे?

India vs South Africa 4Th T20i: टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20i सामन्याचा थरार हा लखनौमध्ये रंगणार आहे. या सामन्यात टीम इंडियाची मॅचविनर जोडीचं खेळणं जवळपास नक्की आहे. जाणून घ्या ते दोघे कोण आहेत.

IND vs SA : टीम इंडियाची ही जोडी म्हणजे विजय फिक्स! कोण आहेत ते दोघे?
Team India Suryakumar Yadav Shubman Abhishek SharmaImage Credit source: PTI
| Updated on: Dec 17, 2025 | 6:27 PM
Share

क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20i सामन्याची प्रतिक्षा आहे. उभयसंघातील चौथा सामना हा बुधवारी 17 डिसेंबरला होणार आहे. सामन्याचं आयोजन हे लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला चौथा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेसमोर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचं आव्हान आहे. त्यामुळे मालिकेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांनी या सामन्याआधी कसून सराव केला आहे.

टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर तिसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केलं होतं. भारताने तिसरा सामना हा एकतर्फी फरकाने जिंकला. आता टीम इंडिया चौथ्या सामन्यात कोणत्या प्लेइंग ईलेव्हनसह उतरणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. मात्र या सामन्यात टीम इंडियाची लकी जोडी खेळणार असल्याचं जवळपास निश्चित समजलं जात आहे. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती ही टीम इंडियाची लकी जोडी आहे.

कुलदीप आणि वरुण प्लेइंग ईलेव्हनमध्ये असताना टीम इंडियाने बहुतांश सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियासाठी ही जोडी लकी असल्याचं म्हटल्यास चूक ठरणार नाही. हे दोघे प्लेइंग ईलेव्हनमध्ये असताना भारताचा 8 पैकी 7 सामन्यांत विजय झाला आहे.

तसेच कुलदीप आणि वरुण या जोडीनेच भारताला धर्मशालेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी 20i सामन्यात विजयी करण्यात योगदान दिलं होतं. त्यामुळे हे दोघे लखनौतील चौथ्या सामन्यात खेळणार, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

टीम इंडियाचा लखनौत दबदबा

टीम इंडियाने आतापर्यंत लखनौत 3 टी 20i सामने खेळले आहेत. भारताने या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडियाला लखनौत विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तसेच या 3 पैकी 2 सामन्यांमध्ये कुलदीप यादव याने 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर वरुणला संधी मिळाल्यास त्याचा हा लखनौतील पहिला टी 20i सामना ठरेल.

सलग 14 वा मालिका विजय की 19 वा पराभव?

दरम्यान लखनौत विजयी मिळवल्यास भारताचा हा सलग 14 वा मालिका विजय ठरेल. तर दक्षिण आफ्रिकेचा हा 29 सामन्यांमधील 19 वा पराभव ठरेल. त्यामुळे लखनौत कोण जिंकणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.