AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळे वटारणाऱ्या नेपाळचं आता भारतानं असं नाक दाबलं श्वासच गुदमरला, बालेन शाह यांना सर्वात मोठा धक्का, देशात हाहाकार

गेल्या काही दिवसांपासून नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताविरोधी निर्णय घेण्याचा धडका लावला आहे, मात्र त्यानंतर आता भारताने नेपाळला असं उत्तर दिलं आहे, ज्यामुळे बालेन शाहा यांना सर्वात मोठा झटका बसला आहे.

डोळे वटारणाऱ्या नेपाळचं आता भारतानं असं नाक दाबलं श्वासच गुदमरला, बालेन शाह यांना सर्वात मोठा धक्का, देशात हाहाकार
balen shahImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 26, 2026 | 5:17 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह हे सातत्याने भारताविरोधी निर्णय घेत आहेत, सुरुवातीला त्यांनी भारतामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लावण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर त्यांनी लिपूलेखवर देखील दावा सांगितला होता. तसेच या संदर्भात मध्यस्थी करावी असं पत्र देखील त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना पाठवलं होतं. त्यानंतर त्यांनी भारतामधून नेपाळमध्ये येणाऱ्या वाहानांवर देखील टोला लावण्याचा निर्णय घेतला, तसेच या वाहनांना अस्थाई वाहने म्हणून नोंदणी करणं बंधकारक केलं होतं. ही प्रक्रिया अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची आहे. दरम्यान त्यानंतर भारताकडून साखरेच्या रुपात नेपाळला पहिला दणका देण्यात आला, पुढील तीन वर्ष आता भारत नेपाळला कोणत्याही प्रकारे साखर निर्यात करणार नाहीये, त्यामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नेपाळसाठी भारताने दिलेला हा झटका ताजा असतानाच आता भारताने बालेन शाह यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

भारतासोबत नेपाळचा वाद वाढतच चालला आहे, याचदरम्यान आता नेपाळने पुन्हा एकदा आपले चहा निर्मितीचे चार कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भारतासोबत सुरू असलेल्या या वादाचा नेपाळला मोठा फटका बसला असून, नेपाळचा चहा उद्योग पूर्णपणे ठप्प झाला आहे. नेपाळने चहाचे कारखाने तर सुरू केले आहेत, मात्र आता भारताच्या कडक नियमांमुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. भारताच्या एफएसएसएआयने चहासाठी जोखीम-आधारित तपासणी प्रणाली लागू केली आहे, या नियमानुसार भारत जो चहा आयात करणार आहे, त्यातील वीस टक्के चहाचे नमुने रँडम पद्धतीने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवले जाणार आहेत, हा नियम तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.

भारताच्या या नव्या नियमाचा नेपाळच्या चहा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. काठमांडू पोस्टच्या एका रिपोर्टनुसार भारताच्या नव्या नियमामुळे नेपाळमध्ये तयार होणारी चहा पावडर ही प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात येत असल्याने जवळपास 3 लाख किलो चहापावडर ही बॉर्डवर अडकून पडली आहे, तर सध्या स्थितीमध्ये नेपाळमध्ये दहा लाख किलो चहापावडर बनून तयार आहे, मात्र भारतातील आयात ठप्प झाल्याने आता या सर्व कारखानदारांनी पुन्हा एकदा आपले कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून...
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून केली पोलखोल