AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअरपोर्टही बंद, बॉम्ब हल्लेही सुरुच, इराणमधील भारतीयांना सुरक्षित कसे काढणार? काय आहेत पर्याय?

Israel-Iran War: भारत सरकारने संयुक्त अरब अमीरात आणि अर्मेनियासोबत संवाद साधला आहे. यूएईचे इस्त्रायल आणि इराणसोबत दोन्ही देशांसोबत संबंध चांगले आहेत. हवाई मार्ग बंद असल्याने इतर पर्यायांवर विचार केला जात आहे.

एअरपोर्टही बंद, बॉम्ब हल्लेही सुरुच, इराणमधील भारतीयांना सुरक्षित कसे काढणार? काय आहेत पर्याय?
| Updated on: Jun 17, 2025 | 12:21 PM
Share

इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ले सुरु आहे. इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र आणि बॉम्बचा मारा केला जात आहे. त्यामुळे इराणमधील विमानतळ बंद आहे. या परिस्थितीत इराणमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना स्वदेशात कसे आणले जाणार? असा प्रश्न आहे. इराणसोबत इस्त्रायल, सीरिया, इराकमधील विमानतळही युद्धामुळे बंद ठेवली आहेत. त्यामुळे भारतीयांना इराणमधून आणण्यासाठी जमिनी मार्ग किंवा समुद्र मार्गाचा पर्याय असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारने संयुक्त अरब अमीरात आणि अर्मेनियासोबत संवाद साधला आहे. पराराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या दोन्ही देशांशी चर्चा केली आहे. सध्या इराणमध्ये असलेल्या 120 भारतीय विद्यार्थ्यांना अर्मेनियाच्या मार्गाने बाहेर काढले जात आहे. अर्मेनियाची सीमा इराणशी जुळली आहे. तसेच दोन्ही देशांचे संबंधही चांगले आहेत. इराणची सीमा पाकिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतालाही लागून आहे. परंतु त्या मार्गाने आणता येणे अवघड आहे. सध्या भारताचा प्रयत्न तेहरान आणि इराणच्या अन्य शहरांमध्ये असलेल्या भारतीयांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा आहे.

भारताने यूएईसोबतही चर्चा सुरु केली आहे. कारण इस्त्रायल आणि इराणसोबत दोन्ही देशांचे संबंध चांगले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतीयांना सुरक्षित स्थानावर पोहचवले जात आहे. भारतीय दुतावासाकडून हेल्पलाइन क्रमांकही सुरु करण्यात आला आहे. कोम या शहरात मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी पोहचले आहे. हे शहर तेहरानपासून १४८ किलोमीटर अंतरावर आहे. इराणमध्ये एकूण १५०० भारतीय विद्यार्थी आहे.

इराण सरकारने म्हटले आहे की, एअरस्पेस बंद आहे. परंतु जमिनी सीमा खुल्या आहेत. त्या ठिकाणावरुन भारतीय नागरिकांना बाहेर काढता येणार आहे. भारतासह आम्हाला अनेक देशांकडून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदतीची विनंती केली आहे. कोणताही देश आपल्या राजनयिक अधिकाऱ्यांना किंवा नागरिकांना बाहेर काढण्यासाठी या सिमांचा वापर करु शकतो. आपल्या नागरिकांचे नाव, वाहन क्रमांक, पासपोर्ट क्रमांक दिल्यावर त्यांना बाहेर काढण्यास मदत करण्यात येणार असल्याचे इराणने म्हटले आहे.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.