AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cough Syrup: कफ सिरपच्या मृत्यूचे लोण महाराष्ट्रापर्यंत? अखेर सत्य आले समोर, डॉक्टरांनी काय सांगितलं?

कफ सिरप दिल्यामुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना काही राज्यांमध्ये घडली होती. त्यानंतर कफ सिरफ देण्यावर बंदी घालण्यात आली होती. आता महाराष्ट्रात देखील कफ सिरपमुळे मृत्यू झाले होते का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यावर डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Cough Syrup: कफ सिरपच्या मृत्यूचे लोण महाराष्ट्रापर्यंत? अखेर सत्य आले समोर, डॉक्टरांनी काय सांगितलं?
cough syrupImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 07, 2025 | 3:08 PM
Share

मध्यप्रदेश आणि राजस्थानात कफ सिरप दिल्याने लहान मुले दगावल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर राज्य सरकारने कफ सिरपवर बंदी घातली. महाराष्ट्रातील नागपूरमध्येही सहा मुलांचा मृत्यू कप सिरपमुळे झाल्याचे म्हटले जात होते. पण आता डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे. सत्य काय आहे चला जाणून घेऊया…

कफ सिरपच्या मृत्यूचे लोण महाराष्ट्रापर्यंत?

नागपूरचे वैदयकीय अधिकारी डॉ दीपक सेलोकर यांनी कप सिरपविषयी बोलताना, ’15 सप्टेंबर पासून आम्हाला अलर्ट आला होता आणि जीएमसीने आम्हाला सांगितले होते की त्यांच्याकडे काही ऍक्युट इंफ्लाईटीस सिंड्रोमचे पेशंट आलेले आहेत त्यामध्ये एक टिपिकल प्रेझेंटेशन आलं होतं की पेशंटला कम्प्लीट लघवी होत नाही त्यावर जीएमसी आमची टीम यांनी त्यावर अभ्यास केला. तर त्यामध्ये दिसून आलं की जे रुग्ण आहे ते सगळे मध्य प्रदेश मधून आलेले आहेत आणि एकाच भागातील असून त्यांनी कप सिरप सारखं काही औषध घेतला आहे’ असे म्हटले.

वाचा: रस्त्यावर जेवण, पांढरे कपडे; सुपरस्टार रजनीकांत यां सुरु केली आध्यात्मिक यात्रा

13 मृत्यू हे मध्य प्रदेशातील आहे 6 मृत्यू महाराष्ट्रातील

पुढे ते म्हणाले की, आतापर्यंत आमच्याकडे 19 लोकांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये 13 मृत्यू हे मध्य प्रदेशातील आहे 6 मृत्यू हे महाराष्ट्रातील आहे. मात्र, महाराष्ट्रातील ज्या सहा केसेस आहेत त्यांच्यामध्ये कुठेही कफ सिरपचा प्रकार दिसून आला नाही… मात्र मध्य प्रदेशातील ज्या केसेस आहेत त्यामध्ये कप सीरपचा प्रादुर्भाव असल्याचा प्राथमिक अंदाज पुढे येत आहे. आमच्या आणि जीएमसीच्या टीमने काही इन्व्हेस्तिकेशन केलं, मात्र आता डिटेल इन्वेस्टीगेशन करण्यासाठी एक टीम येत आहे ती टीम ठरवेल की त्यामध्ये कप सीरपचा काही प्रकार आहे की नाही.

प्राथमिक चौकशी नुसार पेशंटच्या नातेवाईकांशी बोलल्यानंतर त्यांच्याकडे कोल्ड्रिप नावाचे कप सिरप त्यांच्याकडे आढळून आलं आणि ते वापरल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव झाला असल्याचा प्राथमिक अंदाज दिसून येतो. त्यामध्ये काही ड्रग्स आहेत ते कप सिरपमध्ये वापरले जात नाही. त्याचे जास्त प्रमाण असल्याचं सुद्धा पुढे येत आहे. महाराष्ट्रामध्ये जे मृत्यू झाले आहे कप सिरप लिंक आढळून आली नाही. मध्यप्रदेशच्या केसेस मध्ये कप सिरप लिंक असल्याचा संशय आम्हाला आहे त्यावर डिटेल इन्वेस्ट सुरू होत आहे त्यानंतर ते पुढे येईल. सध्या बारा पेशंट आहेत त्यापैकी काही सिरीयस आहेत त्यातील काही सरकारी आणि खाजगी रुग्णालयात आहेत असे डॉक्टरांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.